मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचारांच्या मुद्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. मात्र भाजप नेत्यांविरोधात पुरावे देऊनही त्यांच्यावर कारवाई नसल्याची धुसफुस राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेनेत सुरू होती. त्याचबरोबर राष्ट्रवादीकडे गृहखाते शिवसेेनेला देण्याची मागणी केल्यांचं बोलण्यात येत होतं. त्याच पद्धतीच्या बातम्या देखील प्रसार माध्यमांमध्ये फिरत होत्या. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी त्यावरून निशाणा साधला आहे.
“अनिल परब बरोबरच नंतर हसन मुश्रिफांचा नंबर”; किरीट सोमय्यांचा आघाडीला कडक इशारा
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, महाविकास आघाडीची अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे शिवसेना- राष्ट्रवादीमध्ये अदलाबदलांची वेळ आली आहे का ? म्हणजे राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद आणि शिवसेनेकडे गृहमंत्रीपद असा काहीसा विचार सुरू आहे का? कारण राष्ट्रवादी काॅंग्रेस मुख्यमंत्री पदासाठी उत्सुक असल्याची चर्चा अर्थसंकल्प अधिवेशनात देखील होती.
इतिहास सांगतो, आमुच्या स्त्रीने शत्रू तुडवला! चित्रा वाघ धनंजय महाडिकांवर कडाडल्या
पुढे बोलताना ते म्हणाले की, किरीट सोमय्या काय गृहमंत्री आहे का ? तुम्ही पुरावे जमवा. त्यानंतर केंद्रीय तपास संस्था ऐकत नसतील. तर न्यायालयात जा. तिकडे लगेच न्याय मिळतो. तिकडे आजही संविधानाचा सन्मान होतो. त्यासाठी गृहमंत्री पदाची काय आवश्यकता? या उलट मुख्यमंत्रीपद असताना गृहमंत्रीपद मागणे म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे अशी अवस्था झाली असल्याचीही त्यांनी टिका केली आहे.
‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यांवर माफी नाहीच; धनंजय महाडिकांची सारवासारव
दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या अदलाबदलीची शक्यता वर्तवली जात होती. गृहखातं भाजपबाबत मवाळ असलेल्या सेना अस्वस्थ, काॅंग्रेसच्या नेत्यांवरही कारवाई झाल्याने ते देखील नाराज असल्याची माहिती समजत होती. भाजपचे नेते, नारायण राणे, प्रसाद लाड, किरीट सोमय्या, नितेश राणे, मोहित कंबोज या सगळ्यांबाबात कारवाया करताना पोलिसांनी कारवाई सुमार राहिल्याची काही नेत्यांनी टिका केली होती.
Read also:
- गृहखात्यालाच दमदार पावलं टाकावी लागेल, नाही तर तुमच्यासाठी रोज नवा खड्डा: संजय राऊत
- गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज असणाऱ्या बातम्यांचं मुख्यमंत्र्यांकडून खंडण; म्हणाले..;
- सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला पुन्हा दणका! अनिल देशमुखांच्या संबंधित याचिका फेटाळली
- ऑनलाईन शिक्षणात हजारो अडथळ्यांमुळे अभ्यासावर लक्ष कसं केंद्रीत करावं? मोदींनी सांगितला जबरदस्त उपाय
- केंद्रीय अतिरेकी तपास यंत्रणांना घुसवलं जातंय; राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप