मुंबई : काल सकाळीच ईडीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके आणि प्रदीप उके यांना अटक केली. सुरुवातीला ६ तासांची चौकशी करण्यात आली आणि त्या नंतर त्यांना ईडीने ताब्यात घेतलं. मागील काही दिवसांपूर्वी सतीश उके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरूद्ध याचिका दाखल केली होती. यावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर आणि केंद्रीय यंत्रणांवर हल्ला चढवला.
” नितेश राणे टायगर नव्हे तर ओरडणारा भालू “; सतीश सावंतांची राणेंवर जहरी टीका
ते म्हणाले की, ज्या पद्धतीने काश्मीरमध्ये अतिरेकी घुसतात, बॉम्ब हल्ले करतात आणि नंतर पळून जातात त्याचपद्धतीने सध्या केंद्राच्या अतिरेकी तपास यंत्रणा कामगिरी करत आहेत. केंद्र सरकारकडून ज्या राज्यात भाजपचं सरकार नाही अशा ठिकाणी या केंद्रीय अतिरेकी तपास यंत्रणांना घुसवलं जातं आहे. तपास यंत्रणा काही दिवसांसाठी कारवाई करतात, एखाद्या नेत्याला अटक करतात आणि तपास केल्यानंतर माहित होत की या नेत्याने काहीचं केलं नव्हतं.
३२ वर्ष उलटली, तरीही मुंबईत तसा मी बेघरच; शिवसेनेच्या माजी खासदाराची खंत
या सर्व प्रकारातून जर आता भारतात केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष वाढला तर याला संपूर्ण जबाबदार केंद्र आणि फक्त केंद्र सरकारच असणार आहे हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं. यामुळेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गैरभाजप शासित राज्यातील मुख्यमंत्र्यांना पत्रं पाठवलं आहे. सर्व राजकीय विरोधकांची एकजूट व्हावी यासाठीच त्यांनी पत्रं पाठवली आहेत. सुरुवातीला केंद्रीय यंत्रणा प्रमुख नेत्यांना टार्गेट करत होत्या मात्र आता त्यांनी त्यांची पातळी सोडून दिली आहे. रेल्वेत होणाऱ्या पाकिटमारींचा तपास सीबीआय आणि ईडीकडून करण्याचीच तेवढी गरज आहे, असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला.
अजित पवार अतिशय हुशार राजकारणी, ते बरोबर वेळ मारून नेतात; चंद्रकांत पाटलांचा पवारांना टोला
दरम्यान, नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्या कार्यालयावर, घरावर धाड टाकण्यात आली. त्यांच्या लोकांनी फडणवीस आणि गडकरींवर खोट्या तक्रारी दाखल केल्या असं देखील बोललं जातं आहे. जर त्यांनी खोट्या तक्रारी दाखल केल्या असतील तर त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कारवाई करील किंवा इतर राज्यात असं काही घडत असेल तर दुसऱ्या राज्याचे पोलीस कारवाई करतील. त्या साठी ईडी आणि सीबीआयने येण्याची गरज नाही. मात्र राज्यातील नेत्यांवर, त्यांच्या कार्यकर्त्यांवर दहशत निर्माण व्हावी यासाठी हा सर्व प्रकार सुरु असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. आगामी निवडणुकांसाठी आतापासून राजकीय वातावरण तापलेलं आहे हे या निमित्ताने दिसून येत आहे यात तिळमात्र शंका नाही. आता जनता या राजकीय विरोधकांना मतपेटीतून काय उत्तर देणार ? हे पुढं कळणारच आहे.
Read also:
- “अनिल परब बरोबरच नंतर हसन मुश्रिफांचा नंबर”; किरीट सोमय्यांचा आघाडीला कडक इशारा
- इतिहास सांगतो, आमुच्या स्त्रीने शत्रू तुडवला! चित्रा वाघ धनंजय महाडिकांवर कडाडल्या
- ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यांवर माफी नाहीच; धनंजय महाडिकांची सारवासारव
- नववर्षाच्या शुभमुहूर्तावर एसटी कर्मचाऱ्यांना शेवटचा सातवा अल्टिमेटम; थेट कारवाईचा परिवहन मंत्र्यांचा इशारा
- कोल्हापुर उत्तर पोटनिवडणुक! मतदानाच्या तोंडावरच चंद्रकांत पाटलांनी फोडला आघाडीचा ‘हा’ नेता