मुंबई : सध्या राज्यात महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरु आहे. या संघर्षात केंद्रात असलेल्या सत्तेमुळे भाजप केंद्रीय यंत्रणाचा वापर महाराष्ट्रातील नेत्यांविरोधात चुकीचा करत आहे, असं वारंवार बोललं जातं आहे. यापूर्वी त्यांनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात असेच काहीसे संकेत दिले होते आणि काही दिवसानंतरच लगेचच नवाब मलिक यांना अटक करण्यात आली होती. त्यातच आता भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी पुन्हा भ्रष्टाचाराचा मुद्दा बाहेर काढत आघाडी सरकारच्या दोन मंत्र्यांच्या विरोधात केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
३२ वर्ष उलटली, तरीही मुंबईत तसा मी बेघरच; शिवसेनेच्या माजी खासदाराची खंत
किरीट सोमैया यांनी परिवहनमंत्री अनिल परब आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. परिवनमंत्री अनिल परब यांनी मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांच्याकडून पैसे खाल्ले आणि दापोलीत अवैधरित्या रिसॉर्ट बांधला. कोरोनाच्या काळात वाटेल तेव्हा जाणून बुजून लॉकडाउन केले आणि नंतर घोटाळे केले. त्यामुळे अनिल परब यांनी आता लवकरात लवकर आपली बॅग भरून, जेलमध्ये जाण्याची तयारी करावी असा सूचक इशारा किरीट सोमैयांनी दिला आहे.
अजित पवार अतिशय हुशार राजकारणी, ते बरोबर वेळ मारून नेतात; चंद्रकांत पाटलांचा पवारांना टोला
माझा त्या रिसॉर्टशी काहीही एक संबंध नाही असं परिवहनमंत्री अनिल परब यांनी वारंवार सांगितलं आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून मी हा सर्व प्रकार पाहत आहे आणि या प्रकरणात अनिल परब यांच्याविरोधात केंद्र सरकारची याचिका आहे. या याचिकेची कोर्टानेही दखल घेतली आहे. त्यामुळे अनिल परब यांना १६ एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीनंतर बॅग भरावी लागेल असं सूचक वक्तव्यही किरीट सोमैयांनी केलं आहे.
कोल्हापुर पोटनिवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज; 15 उमेदवारांसाठी 2 हजार 200 कर्मचाऱ्यांची नियक्ती
हसन मुश्रिफांबाबत बोलताना सोमैयांनी म्हटलं आहे की त्यांच्या कारनाम्यांवरील कारवाईला आजपासून सुरुवात होणार आहे. त्यांनी ज्या शेल कंपन्यांमध्ये पैसा गुंतवला आहे आणि घोटाळा केला आहे त्याबद्दल कोर्ट आता चौकशीचे आदेश देईल. त्यांनी एकूण १५८ कोटींचा घोटाळा केला आहे असा खळबळजनक आरोप सोमैयांनी केला आहे. महाविकास आघाडीचे याआधीच दोन मंत्री अटकेत आहेत आणि जर आता सोमैयांनी म्हटल्याप्रमाणे परब, मुश्रीफ यांच्यावर कारवाई झाली तर निश्चितपणे महाविकास आघाडी सरकार साठी ही धोक्याची घंटा असणार आहे. त्यामुळे आता खरचं सोमैयांनी सांगितल्याप्रमाणे कारवाई होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read also:
- इतिहास सांगतो, आमुच्या स्त्रीने शत्रू तुडवला! चित्रा वाघ धनंजय महाडिकांवर कडाडल्या
- ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यांवर माफी नाहीच; धनंजय महाडिकांची सारवासारव
- नववर्षाच्या शुभमुहूर्तावर एसटी कर्मचाऱ्यांना शेवटचा सातवा अल्टिमेटम; थेट कारवाईचा परिवहन मंत्र्यांचा इशारा
- कोल्हापुर उत्तर पोटनिवडणुक! मतदानाच्या तोंडावरच चंद्रकांत पाटलांनी फोडला आघाडीचा ‘हा’ नेता
- ” नितेश राणे टायगर नव्हे तर ओरडणारा भालू “; सतीश सावंतांची राणेंवर जहरी टीका