मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचारांच्या मुद्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. मात्र भाजप नेत्यांविरोधात पुरावे देऊनही त्यांच्यावर कारवाई नसल्याची धुसफुस राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेनेत सुरू होती. त्याचबरोबर राष्ट्रवादीकडे गृहखाते शिवसेेनेला देण्याची मागणी केल्यांचं बोलण्यात येत होतं. त्याच पद्धतीच्या बातम्या देखील प्रसार माध्यमांमध्ये फिरत होत्या. त्यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
इतिहास सांगतो, आमुच्या स्त्रीने शत्रू तुडवला! चित्रा वाघ धनंजय महाडिकांवर कडाडल्या
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची आज दुपारी वर्षा येथील निवासस्थानी बैठक पार पाडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, माझा माझ्या सहाकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. तसेच ते सध्या राज्यात उत्तम काम करीत आहे. त्यामुळे समाज माध्यंमावर फिरत असलेल्या बातम्यांचं उद्धव ठाकरे यांच्यांकडून खंडण करण्यात आलं आहे.
‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यांवर माफी नाहीच; धनंजय महाडिकांची सारवासारव
शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या अदलाबदलीची शक्यता वर्तवली जात होती. गृहखातं भाजपबाबत मवाळ असलेल्या सेना अस्वस्थ, काॅंग्रेसच्या नेत्यांवरही कारवाई झाल्याने ते देखील नाराज असल्याची माहिती समजत होती. भाजपचे नेते, नारायण राणे, प्रसाद लाड, किरीट सोमय्या, नितेश राणे, मोहित कंबोज या सगळ्यांबाबात कारवाया करताना पोलिसांनी कारवाई सुमार राहिल्याची काही नेत्यांनी टिका केली होती.
दरम्यान, संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, गृहखात्याने अधिक सक्षम झालं पाहिजे. काल मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली हे गृहखात्यावर आक्रमण आहे. या प्रकरणाकडे गंभीर पाहिलं पाहिजे. आस्ते कदम भूमिका कोणी घेत असेल तर ते स्वत:साठी फाशीचा दोर वळत आहेत, असं समजा. गृहखात्यालाच आता दमदार पावलं टाकावी लागेल. नाही तर तुम्ही तुमच्यासाठी रोज नवा खड्डा खोदाल असा इशारा देखील संजय राऊत यांनी दिला आहे.
Read also:
- गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज असणाऱ्या बातम्यांचं मुख्यमंत्र्यांकडून खंडण; म्हणाले..;
- सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला पुन्हा दणका! अनिल देशमुखांच्या संबंधित याचिका फेटाळली
- ऑनलाईन शिक्षणात हजारो अडथळ्यांमुळे अभ्यासावर लक्ष कसं केंद्रीत करावं? मोदींनी सांगितला जबरदस्त उपाय
- केंद्रीय अतिरेकी तपास यंत्रणांना घुसवलं जातंय; राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप
- “अनिल परब बरोबरच नंतर हसन मुश्रिफांचा नंबर”; किरीट सोमय्यांचा आघाडीला कडक इशारा