मुंबई : आर्यन खान प्रकरणातील मुख्य साक्षीदार असलेला प्रभाकर साईलचा काल ह्यदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. साईलचे वकिल तुषार खंदारे यांनी प्रभाकर साईलच्या निधनाची माहिती दिली. मुंबईतील चेंबुर येथील माहुल भागात असलेल्या त्यांच्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं आहे. अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला सोडवण्यासाठी त्यांनी खंडणी मागितल्याचा आरोप प्रभाकर साईलतर्फे करण्यात आला होता. अशातच आता भाजपचे नेते अतुल भातखळकरांनी याबाबत राज्य सराकराला सवाल केला आहे.
काळजी करू नका, सुधारणेला वाव असेल तर सुधारणा करू! वळसे पाटलांचा राऊतांना शब्द
मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचा मृत्यू झाला आहे. साईलचा मनसुख हिरेन तर करण्यात आलेला नाही ना? असा सवाल अतुल भातखळकरांनी राज्य सरकारला केला आहे. गोव्याकडे मुंबईहुन जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रुझवर सापडलेल्या ड्रग्जमुळे आर्यन खानसह आठ जणांना ताब्यात घेतलं होतं. यात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी त्यांच्यावर कारवाई केली होती. या प्रकरणी कारवाई करणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे पंच साक्षीदार म्हणून प्रभाकर साईल यांच्यासह काही जणांनी काम केलं होतं. मात्र प्रभाकर साईलचे वकिल तुषार खंदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी साईलचं निधन झालं आहे.
राष्ट्रवादी काॅंग्रेस हा स्वार्थी पक्ष असून तो सत्तेसाठी..; चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीवर निशाणा
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी झालेल्या कारवाईतील साक्षीदार प्रभाकर साईल, मनिष भानुशाली आणि अन्य साक्षीदारांनी केलेल्या आरोपांची चौकशीही करण्यात आली होती. साक्षीदार प्रभाकर साईलचा जवाब नोंदवण्यात आला होता. प्रभाकर साईल यांनी एऩसीबीचे तत्कालीन विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांच्यासह नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांवर खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता.
फडणवीसांकडे अहमदनगर, सोलापुरची जबाबदारी; रोहित पवारांचा शिंदे, विखेंना चिमटा
दरम्यान, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे राजकीय वातावरण देखील चांगलचं तापलं दिसून आलं. यात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली होती.
Read also:
- सरकार पाडण्याच्या गुढ्या मनात उभारणाऱ्यांना चोख उत्तर; मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला
- तर चंद्रकांत पाटील ऑफर का घेऊन आले मग ? मुन्ना महाडिकांना जयश्री जाधवांचे तिखट उत्तर
- कोल्हापुरात भाजपचं वजन वाढलं; एसटी संघटना, हिंदू एकता आंदोलन समितीचा भाजपला पाठींबा
- मोठी बातमी ! आर्यन खान प्रकरणातील मुख्य साक्षीदार प्रभाकर साईलंच निधन
- देशाला ३४ वर्षानंतर मोदींनी नवीन शैक्षणिक धोरण दिलं; विखे पाटलांकडून मोदींचं कौतुक