गोंदिया : महाविकास आघाडीतील सध्या अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी भ्रष्टाचारावरून कारवाई केली आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये सातत्याने टिका टिप्पणी केली जात आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण काहीसं पहिल्यापेक्षा चांगलचं बदलून गेलं आहे. अशातच आता काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोंदियातील कुनबी मेळाव्याच्या जाहीर सभेत यावरून टीका केली आहे.
साईलचा मनसुख हिरेन तर करण्यात आलेला नाही ना? भाजपचा राज्य सरकारला सवाल
यावेळी कुणबी समजाचे सभागृह, वाचनालय व वसतिगृह बांधण्यात येत आहे. त्यावेळी या कामासाठी कुणी किती निधी दिला. याची यादी नाना पटोले यांनी वाचून दाखवली. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी यात कोणतेही पैसे दिले नाहीत. दान हे गुप्त ठेवा नाही तर इडी लागते असा टोला देखील त्यांनी लगवला. भाजपने या देशातील जनतेला एप्रिल फुल बनविले असुन दररोज देशातील जनता एप्रिल फुलमध्ये जगत आहे. तर ज्या घोषणा भाजपने करून केंद्रात सत्तेवर आलेत. त्या सर्व घोषणा विसरून त्यांनी जनतेला एप्रिल फुल बनवलं असल्याची टीका देखील त्यांनी केली.
सरकार पाडण्याच्या गुढ्या मनात उभारणाऱ्यांना चोख उत्तर; मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला
अलिकडेच नाना पटोले यांचे वकिल सतीश उके यांच्यावर इडीनं कारवाई केली होती. इडीच्या अधिकाऱ्यांनी सतीश उके यांना नागपुरमधून ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे सतीश उके सध्या इडीच्या कोठडीत आहेत.
तर चंद्रकांत पाटील ऑफर का घेऊन आले मग ? मुन्ना महाडिकांना जयश्री जाधवांचे तिखट उत्तर
दरम्यान, नाना पटोले यांनी इडीच्या कारवायांबद्दल सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयानं दखल घ्यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर इडीचा ससेमिरा पाठीमागे लागल्याने इडीने मोर्चा हा नाना पटोले यांच्याकडे वळविला असल्याने आगामी काळात कशा पद्धतीच्या कारवाया होतील, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- काॅंग्रेसचे ते २५ आमदार दिल्लीत प्रशिक्षण घेणार; नाराज नसल्याचं काॅंग्रेसच्याच नेत्यांनी सांगितलं
- पंच प्रभाकर साईलचा मृत्यू संशयास्पद! वळसे पाटलांनी दिले चौकशी करण्याचे आदेश
- मराठी माणसाच्या भाषेवरून अजित पवारांची चौफेर टोलेबाजी; मुख्यमंत्र्यांसमोरच सांगितला किस्सा
- काॅंग्रेसच्या नेत्यांनं आव्हांडासमोर बांधलं हाताला घड्याळ; अन् काॅंग्रेसच्या आमदारांनं काढला पळ
- पार्थ पवार कोरेगावच्या राजकारणात? “वेल कम टु कोरेगाव” म्हणत शिवसेना नेत्याचं आव्हान