सांगली : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज सांगलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी राज्यातील महत्वाचे नेते कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होते. त्या अगोदर जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी कार्यक्रमाची काल पाहणी केली होती. यावेळी शरद पवारांनी जोरदार भाषण केलं.
मराठी माणसाच्या भाषेवरून अजित पवारांची चौफेर टोलेबाजी; मुख्यमंत्र्यांसमोरच सांगितला किस्सा
शरद पवार म्हणाले की, आज देशाचं राजकारण एका वेगळ्या वळणाला जात असून राज्य वेगळा विचार असणाऱ्या लोकांच्या हातात आहे. सांगलीतील या शिराळा तालुका तसेच सातारा जिल्ह्यातून यशवंत चव्हाण, वसंतदादा पाटील, राजाराम बापू व अशी नावं आहेत. ज्यांनी देशात एक वेगळं स्थान निर्माण केलं. यांनी लोकांच्या जीवनात चांगले दिवस येतील या दृष्टीने काम केले. त्याचबरोबर या नेत्यांनी विकासाचं व माणसं जोडण्याचंही काम केलं, मात्र आज देशामध्ये धर्माच्या नावावर माणसांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करून नागरिकांमध्ये अंतर निर्माण करण्याचं काम केलं जात असल्याचंही त्यांनी सांगितले.
काॅंग्रेसच्या नेत्यांनं आव्हांडासमोर बांधलं हाताला घड्याळ; अन् काॅंग्रेसच्या आमदारांनं काढला पळ
त्यांनी देशातील महान व्यक्तींचा देखील आपल्या भाषणात उल्लेख केला. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू मौलाना आझाद यांच्यासह इतरांनी स्वातंत्र्यसाठी योगदान दिले. देश उभारणीसाठी कष्ट केले. त्यांचा सन्मान, आदर ठेवण्याऐवजी टीका टिप्पणी करणं यावर धन्यता मानणारं नेतृत्व आज दुर्दैवाने देशात बघायला मिळत आहे. त्यांचा परिणाम लोकांमध्येही एकप्रकारची अस्वस्थता असल्याचा दावा देखील शरद पवारांनी यावेळी केला.
पार्थ पवार कोरेगावच्या राजकारणात? “वेल कम टु कोरेगाव” म्हणत शिवसेना नेत्याचं आव्हान
दरम्यान, जे राजकारण करायचे आहे ते राजकारण समाजाच्या हिताचे, विकासाचे, शिक्षण , बेरोजगारीचा प्रश्न कसा सुटेल, शेती संपन्न कशी होईल, कामगाराला त्याच्या घामाची किंमत कशी मिळेल, समाजातील उपेक्षित वर्ग आहे तो सन्मानाने कसा जगेल यावर आधारीक राजकारणाची आवश्यकता असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
Read also:
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन! अनेक नेते उपस्थित
- राज्यात पॉलिटिकल प्रदूषण वाढलंय का? आदित्य ठाकरेंचं भन्नाट उत्तर
- “भाजपमुळे देशात जनता रोज एप्रिल फुलमध्ये जगतेय” नाना पटोलेंची मिश्कील टीका
- काॅंग्रेसचे ते २५ आमदार दिल्लीत प्रशिक्षण घेणार; नाराज नसल्याचं काॅंग्रेसच्याच नेत्यांनी सांगितलं
- पंच प्रभाकर साईलचा मृत्यू संशयास्पद! वळसे पाटलांनी दिले चौकशी करण्याचे आदेश