कोल्हापूर : हिंदू नवर्षाच्या सुरुवातीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावरून सर्वच पक्षांवर जोरदार हल्ला चढवला आहे. राज्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या जन्मानंतर जातीयवाद फोफवला असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केला. अशातच आता शरद पवारांनी त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते कोल्हापूर मध्ये बोलत होते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन! अनेक नेते उपस्थित
राज ठाकरे यांना प्रत्युत्तर देताना शरद पवार म्हणाले की, राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी जातीवाद पसरवत असल्याची टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या गेल्या चार पाच वर्षाच्या वाटचालीचा त्यांनी उल्लेख केला. ते काही म्हणू शकतात. त्यांच्या तोंडाला कुणी काही मर्यादा आणू शकत नाही. असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला. ते पुढे म्हणाले की, राज्यात राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करतं. महाराष्ट्राची विधानसभा, विधान परिषद, पहिल्यांदा मला असं वाटतं छगन भुजबळ नेते होते. त्यानंतर मधूकर पिचड नेते होते ते आदिवासी होते. भुजबळ कोणत्या समाजाचे सर्वांना माहिती आहे. अरूण गुजराथी होते. यावेळी अजित पवारांची पहिल्यांदा निवड झाली. यांच काऱण त्यांना 30 वर्ष विधीमंडळात येऊन झाली. असं राज ठाकरे यांना वाटत असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला.
राज्यात पॉलिटिकल प्रदूषण वाढलंय का? आदित्य ठाकरेंचं भन्नाट उत्तर
1999 मध्ये ज्यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसचा जन्म झाला तेव्हा पासून जातीचं राजकारण सुरू झालं. राष्ट्रवादीला जातीयवाद हवा आहे, आणि त्यानंतरच जातीवाद वाढला आहे. ही गोष्ट शरद पवारांना माहिती आहे. त्याचबरोबर नवाब मलिक तुरूंगात जाऊनही सत्तेत आहे. बदल हवा असेल तर हे चालणार नाही. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागू नये असा कारभार असावा. असा टोला देखील त्यांनी लगावला. दोन वर्षांची कसर राज ठाकरेंनी यावेळी भरून काढली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीवर राज ठाकरेंनी सडकून टीका केली आहे. मागील काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधानसभेत सांगत होते की माझ्या कुटुंबाला हात घालु नका, हिंमत असेल तर मला अटक करा. एवढंच जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या कुटुंबाला सांग मुंबई महापालिकेत जाऊ नका, असा टोलाही राज यांनी मारला.
“भाजपमुळे देशात जनता रोज एप्रिल फुलमध्ये जगतेय” नाना पटोलेंची मिश्कील टीका
यशवंत जाधव यांच्यावर झालेल्या कारवाईबद्दल देखील राज ठाकरेंनी यावेळी भाष्य केले. इतक्या वर्षांपासून मुंबईमध्ये तुम्ही सत्तेत आहात, मुंबई तुम्ही पोखरून काढली आहे. तुम्ही मुंबईमध्ये कसलाही विकास इतक्या वर्षांपासून केला नाही हे देखील राज ठाकरेंनी ठणकावून सांगितले. माझी पंतप्रधानांना विनंती आहे. तुम्ही ईडी, इन्कम टॅक्सच्या धाडी टाकता आहात ना, तश्याच धाडी पोलिसांना झोपडपट्ट्यातल्या मदरशांवर मारायला लावा. आमचा प्रार्थनेला विरोध नाही, पण आता मस्जिदींवर लागलेले भोंगे उतरवावेच लागतील. भोंगे काढले नाही तर पुढील काळात मस्जिदींवर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावू, असा इशाराही राज यांनी दिला आहे. आज सत्ता पक्षातील भ्रष्ट नेत्यांवर ईडीची, सीबीआयची कारवाई होत आहे. शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाची लालसा होती ना, म आता भोगा त्याची फळं. तुम्हला राजकारण करता येते, तर मग समोरचेही राजकारण करणार ना, असा टोलाही यावेळी राज ठाकरेंनी हाणला आहे.
Read also:
- राष्ट्रवादीमुळे जातीयवाद फोफावलाय; राज ठाकरेंचा शरद पवारांंवर निशाणा
- “निवडणुकीनंतर सेना प्रमुखांना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आठवलं, आधी झोपले होते का?”
- मुख्यमंत्री, गृहमंत्रीपदाच्या बातम्यांवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, मला तर..;
- भाजपला सांगलीत मोठा धक्का! भाजपच्या माजी मंत्र्यांचा राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश
- “गांधी, नेहरूंचा आदर सन्मान करण्याऐवजी, त्यांच्यावर टिका टिप्पणी केली जातेय”; शरद पवारांची खंत