मुंबई : हिंदू नवर्षाच्या सुरुवातीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावरून सर्वच पक्षांवर जोरदार हल्ला चढवला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखेच भाषण यावेळी राज ठाकरेंनी केल्याचे बोलले जात आहे. मागील दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या महामारीमुळे दोन वर्षात शिवाजी पार्क मैदानावरून राज ठाकरेंनी भाषण केलं नव्हतं.
“भाजपमुळे देशात जनता रोज एप्रिल फुलमध्ये जगतेय” नाना पटोलेंची मिश्कील टीका
दोन वर्षांची कसर राज ठाकरेंनी यावेळी भरून काढली आहे. लोकं दोन वर्षात या लॉकडाऊनमुळे सर्व काही विसरून गेली आहेत. २०१९ची विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर झालेला थिल्लरपणा देखील ते विसरून गेले हे विशेष. भाजप- शिवसेना विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी अशी निवडणूक झाली आणि निवडणूक निकालानंतर मात्र चित्र काहीतरी वेगळंच पाहायला मिळालं.
काॅंग्रेसचे ते २५ आमदार दिल्लीत प्रशिक्षण घेणार; नाराज नसल्याचं काॅंग्रेसच्याच नेत्यांनी सांगितलं
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निकालानंतर मुख्यमंत्री आपल्याला पाहिजे असं सुचलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांमध्ये ते वारंवार सांगायचे की मुख्यमंत्री भाजपचा होणार. मात्र तेव्हा तुम्ही मूग गिळून गप्प बसला आणि निवडणूक निकालानंतर तुमची अडीच वर्ष मुख्यमंत्री पद अशी टिमकी वाजवायला सुरुवात केली. निकाल लागला आणि सकाळी उठून बघतो तर काय लग्नाचा जोडा वेगळाच. पळून कुणाबरोबर गेली अन् लग्न कुणाबरोबर काहीच कळेना. राज्यातील जनतेलाही काही कळलं नसेल की नेमकं झालंय तरी काय ?.. नंतर हळूच आवाज यायला सुरुवात झाली की ये शादी हो नाही सकती आणि जोडा लगेचच दोन दिवसांमध्ये बदलण्यात आला.
पंच प्रभाकर साईलचा मृत्यू संशयास्पद! वळसे पाटलांनी दिले चौकशी करण्याचे आदेश
राज्यातील तीन नंबरचा असणारा पक्ष एक नंबर आणि दोन नंबर असणाऱ्या पक्षांना फिरवतोय हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. हे फक्त आपल्याकडेच घडताना दिसत आहे. आधी शिव्या घालता अन् नंतर मांडीवर बसता. युती म्हणून तुम्हाला मतदान करणाऱ्या मतदारांशी तुम्ही गद्दारी केली, असा टोला ठाकरेंनी लगावला.
Read also:
- मुख्यमंत्री, गृहमंत्रीपदाच्या बातम्यांवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, मला तर..;
- भाजपला सांगलीत मोठा धक्का! भाजपच्या माजी मंत्र्यांचा राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश
- “गांधी, नेहरूंचा आदर सन्मान करण्याऐवजी, त्यांच्यावर टिका टिप्पणी केली जातेय”; शरद पवारांची खंत
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन! अनेक नेते उपस्थित
- राज्यात पॉलिटिकल प्रदूषण वाढलंय का? आदित्य ठाकरेंचं भन्नाट उत्तर