पुणे : माझ्या जीवनातला आजचा क्षण सुवर्ण अक्षराने लिहावा असा आहे. माझा जन्म ऊसतोड मजुराच्या पोटी झालाय. माझा जीवनातला हा दिवस अजित पवार यांच्या शिवाय शक्यच नव्हता हे प्रामाणिकपणे सांगतो. मागच्या सरकारच्या काळात मंडळ आलं गेलं. नाव जरी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचं आहे तरी त्यांनी आयुष्यभर ऊसतोड मजुरांसाठी लढा दिला. त्यांच्या कार्यकालात त्यांना हे महामंडळ देणं शक्य झालं नाही. त्यांच्यानंतर त्यांच्या वारसदारांना संधी मिळाली पण त्यांनाही हे महामंडळ निर्माण करता आले नाही, असा टोला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं नाव न घेता लगावला आहे.
विरोधकांचा डाव पंतप्रधान इम्रान खाननं उधळून लावला; संसदेत न जाता थेट राष्ट्रपतीची घेतली भेट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या मुख्य कार्यालयाचे उद्धाघटन करण्यात आलं. पुणे येथील सामाजिक न्याय भवन परिसर, येरवडा या ठिकाणी उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार रोहित पवार हे उपस्थित होते. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे.
“काल आयुष्यात पहिल्यांदा राजकीय सभा अनुभवली”; राज ठाकरेंच्या भाषणांवर अभिनेत्रीची प्रतिक्रिया
दरम्यान, कदाचित हे महामंडळ माझ्या आणि अजित पवार यांच्या हस्ते व्हावं, ही नियतीची इच्छा असावी, असं धनंजय मुंडे म्हणाले.आजचा कार्यक्रम हा मुंडे साहेबांनी ही आदरांजली आहे. असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत. तर, ऊसतोड भगिनी आहेत, त्यांचा प्रश्न आहे. चार दिवस कमी होतात म्हणून आमच्या भगिनीच गर्भायश काढावा लागत असेल तर काय तोंड घेऊन आम्ही मंत्रिपदी बसलोय, अशी खंत देखील धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलीय.
“मोरी तुंबली आहे वाटलं, काही तरी निघेल, पण भाजपचं गांडूळ निघालं”;
आमच्या भगिनींच्या आरोग्याची काळजीही महामंडळ घेईल. भगवान गड असेल किंवा बीड जिल्ह्यातील इतर गड असतील हे कोणत्याही मोठ्या माणसांच्या देणगीवर नाही तर ऊसतोड मजुरांच्या देणगीवर मोठे होतायेत, असं देखील धनंजय मुंडे म्हणाले.
Read also:
- ” असंतुष्ट आत्मांच्या छाताडावर बसून महापालिका जिंकणार”; संजय राऊतांची भीष्मप्रतिज्ञा
- राज ठाकरेंना हाफचड्डीपासून ओळखतो, हा त्यांचा सिझनेबल कार्यक्रम
- मनसे भाजपची ‘सी’ टीम झाल्याचा आम्हाला आनंद; आदित्य ठाकरेंची मनसेवर खोचक टीका
- वाह रे बहाद्दरांनो, समोर यायची हिंमत नाही अन्..; सभेत दगड फेकणाऱ्यांना चित्रा वाघ यांनी सुनावलं
- काॅंग्रेसने कधीही जातीचं राजकारण केलं नाही; पाटलांच्या वक्तव्यांनी अनेकांच्या भुुवया उंचावल्या