मुंबई : महाराष्ट्र झोपेत असताना जसे सरकार आले, तसे महाराष्ट्र झोपेत असतानाच हे सरकार पडेल,’ असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘मी सारखा झोपेतून उठतो की सरकार पडलं का काय’, असा टोला अजित पवारांनी लगावला आहे.
पुण्यात कोरोना स्थिती संदर्भातील आढावा बैठक संपल्यावर पत्रकारांसोबत अजित पवारांनी संवाद साधला. यावेळी अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी केली.
चंद्रकांत पाटील मोठा माणूस आहेत. ते म्हणाले आहेत की, मी जर बोलायला लागलो तर फार फटकळय. अमकंय तमकंय… कशाला उगाच त्यांच्या नादी लागायचं. आपलं दुरून डोंगर साजरे. ‘मी वाटच पाहतोय की सरकार कधी पडतंय. सारखा झोपेतून उठतो की पडलं का काय सरकार! लगेच टीव्ही लावतोय. हे चॅनेल लाव, ते चॅनेल लाव…. कितीदा सांगायचं की हे तीन नेते एकत्र आहेत तोपर्यंत कुणी मायचा लाल हे सरकार पाडू शकत नाही, असा टोला अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.
दरम्यान, याआधी देखील अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांच्या दाव्यावर उत्तर दिले होते. हे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी जागे असताना की झोपेत केलं होतं, असा सावल त्यांनी विचारला होता. तर यावर उत्तर देताना उभ्या उभ्या किंवा झोपेत मी बोलत नाही. अजितदादा झोपेत सरकार तुम्हीच आणलं होतं, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.
Read Also :
- ‘अंधेरी नगरी चौपट राजा अशी महाआघाडी सरकारची अवस्था’
- ‘वडेट्टीवारसाहेब तुमच्या निर्णयामुळे मुख्यमंत्र्यांना रोज मंत्रालयात जायला लागू शकत’
- ‘घरीच थांबा, शिवभक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी रायगडावर जाईन’
- हर्षवर्धन पाटलांनी घेतली पृथ्वीराज चव्हाणांची भेट, मराठा आरक्षणाबाबत केली महत्त्वाची मागणी
- ‘नुसती स्तुती करू नये, गडकरींसारखे कामही करावे’