मुंबई : राज्यात 5 टप्प्यात अनलॉकची प्रक्रिया पार पाडली जाईल व 18 जिल्हे अनलॉक करण्यात येतील अशी घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली होती. मात्र काही वेळातच नवी नियमावली अद्याप विचाराधीन असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले. यावरून आता भाजपने ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
काय सुरू, काय बंद ❓
कुठे आणि केव्हापर्यंत❓
लॉक की अनलॉक❓
पत्रपरिषद की प्रेसरिलीज❓
अपरिपक्वता की श्रेयवाद❓#Lock #Unlock pic.twitter.com/bZF1AEx9yY— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 3, 2021
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. काय सुरू, काय बंद ? कुठे आणि केव्हापर्यंत ?लॉक की अनलॉक ? पत्रपरिषद की प्रेसरिलीज ? अपरिपक्वता की श्रेयवाद ?, असे प्रश्न फडणवीसांनी विचारले आहे.
अंधेर नगरी चौपट राजा अशी अवस्था राज्याची महाआघाडी सरकार करत आहे. कुणाचा कुणाशी ताळमेळ नाही @VijayWadettiwar प्रेस घेऊनअनलॅाकडाऊन केल्याची घोषणा करतात. मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीतबैठकीत निर्णय झाल्याचे सांगतात, काहीवेळानतंर सरकारी प्रेसनोटयेते अनलॅाकडाऊनचा प्रस्ताव आहे निर्णय नाही pic.twitter.com/BRuLOCaP8G
— Keshav Upadhye (@keshavupadhye) June 3, 2021
भाजप नेते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. अंधेर नगरी चौपट राजा अशी अवस्था राज्याची महाआघाडी सरकार करत आहे. कुणाचा कुणाशी ताळमेळ नाही. विजय वडेट्टीवार यांनी प्रेस घेऊन अनलॅाकडाऊन केल्याची घोषणा करतात. मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीतबैठकीत निर्णय झाल्याचे सांगतात, काहीवेळानतंर सरकारी प्रेसनोटयेते अनलॅाकडाऊनचा प्रस्ताव आहे निर्णय नाही, अशी टीका उपाध्ये यांनी केली.
दरम्यान, राज्यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे त्याठिकाणी पूर्णपणे अनलॉक केले जाणार असल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली होती. मात्र, काही क्षणातच राज्यातील निर्बंध हटवण्यात आलेले नाहीत, नव्या नियमांचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगण्यात आले.
Read Also :
- ‘वडेट्टीवारसाहेब तुमच्या निर्णयामुळे मुख्यमंत्र्यांना रोज मंत्रालयात जायला लागू शकत’
- ‘घरीच थांबा, शिवभक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी रायगडावर जाईन’
- हर्षवर्धन पाटलांनी घेतली पृथ्वीराज चव्हाणांची भेट, मराठा आरक्षणाबाबत केली महत्त्वाची मागणी
- ‘नुसती स्तुती करू नये, गडकरींसारखे कामही करावे’
- मंत्रिमंडळ बैठक: ठाकरे सरकारने घेतले ‘हे’ 3 मोठे निर्णय