भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी काल मोठं वक्तव्य केलं होत. तुफान आ रहा है… केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जिथे जातात, त्या ठिकाणी असंख्य राजकीय हालचाली सुरु होतात. शाह यांचं शनिवारी मुंबईत आगमन होतंय, त्यामुळेच ‘हे सर्व प्राणी घाबरलेत’ अशा आशयाचं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलंय. महत्त्वाची बाब म्हणजे फक्त विरोधकांसाठीच नव्हे तर सत्ताधारी शिंदे-फडणवीसही अमित शहांसमोर आज मोठी परीक्षा देतील, असं म्हणलं जात आहे.
हेही वाचा… काँग्रेसचं डॅमेज कंट्रोल? राहुल गांधी लवकरच ‘मातोश्री’वर..!
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा शनिवारी आणि रविवारी मुंबई दौरा आहे. आज शनिवारी संध्याकाळी ते मुंबईत दाखल होतील. उद्या ज्येष्ठ निरुपणकार डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. रविवारी शहांच्या हस्ते अप्पासाहेबांना हा पुरस्कार दिला जाईल. तत्पुर्वी शनिवारी संध्याकाळी अमित शाह सह्याद्री अतिथि गृहात असतील. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करतील. भाजपच्या काही नेत्यांच्या भेटी घेतील.
हेही वाचा… सचिन वाझे, परमबीर प्रकरणात अनिल देशमुखांकडून मोठा खुलासा…
अमित शहांच्या दौऱ्यातील महत्वाचे मुद्दे..
- येत्या मे महिन्यात सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल लागणार आहे.सत्ताधाऱ्यांमधील नेते मंडळी चिंतेत आहेत. शिंदेंचे आमदार अपात्र ठरल्यास पुढची रणनीती काय असेल, यावरून आजच्या दौऱ्यात विचारमंथन होण्याची शक्यता आहे.
- सुप्रीम कोर्टाचा निकाल शिंदे-फडवणवीसांविरोधात लागला तर भाजपचा प्लॅन बी काय असेल, यावरही चर्चा घडण्याची शक्यता आहे. या प्लॅन बीची जबाबदारी कुणावर असेल, त्या व्यक्तीचं नावही आज निश्चित होऊ शकतं.
- मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा हा दौरा सर्वात महत्त्वाचा मानला जातोय. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे सध्याच्या पक्षसंघटनाविषयीच्या घडामोडी अमित शाह यांच्यापर्यंत पोहोचवतील. तसेच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणते पक्ष सोबत घ्यायचे, यावरूनही चर्चा होऊ शकते.
Read also
हेही वाचा… मोदी सरकारच्या चुकीमुळं पुलवामा हल्ला झाला, माजी राज्यपालांचा मोठा गौप्यस्फोट
हेही वाचा… राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार का?; अमोल कोल्हे यांनी दिलं उत्तर
हेही वाचा… माजी उपमुख्यमंत्र्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, भाजपला मोठा धक्का
हेही वाचा… “राहुल गांधींनी महाराष्ट्रात पाऊल ठेवण्यापूर्वी सावरकरांची माफी मागावी”