महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणावर डॅमेज कंट्रोल सुरू आहे असं दिसत आहे. कारण राहुल गांधी लवकरच मातोश्रीवर येणार असल्याची माहिती मिळत आहे. राहुल गांधींच्या या दौऱ्याची नेमकी तारीख निश्चित झाली नसली तरी येत्या काही दिवसांत ही भेट होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या भेटीदरम्यान सावरकर वाद आणि लोकसभा निवडणुकीवर चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच भेट असणार आहे. सावरकर वादानंतर काँग्रेसकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
हेही वाचा… “चंद्रकांत पाटील आलेला पाहुणा? त्यांचा रुबाब पुणेकर उतरवतील”; धंगेकरांची खोचक टीका
गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांच्या भूमिकेमुळे, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत आलबेल नसल्याचं बोललं जात आहे. विशेषतः ठाकरे गट नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर कुठेतरी काँग्रेसकडून डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही बोललं जात होतं. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंची भेट त्यासाठीच होत असल्याच्याही सध्या चर्चा रंगल्या आहेत.
Read also
हेही वाचा… सचिन वाझे, परमबीर प्रकरणात अनिल देशमुखांकडून मोठा खुलासा…
हेही वाचा… राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केल्यानंतर निवडणूक आयोग राष्ट्रवादीला आणखी एक धक्का देणार?
हैही वाचा… “अजित पवार अस्वस्थ त्यामुळे काहीही होऊ शकतं”; शिंदेंच्या मंत्र्याचे मोठे विधान