केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीसह, ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द केला. राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या धक्क्यातून पक्ष सावरत असतानाच आता निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्लीत देण्यात आलेला बंगला काढून घेतला जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा… “उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणं अशक्य, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील.”
केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा रद्द केला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिल्लीत देण्यात आलेला बंगला देखील काढून घेतला जाण्याची शक्यता आहे. दिल्ली सरकारकडून लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस आणि सीपीआयला तशी नोटीस दिली जाऊ शकते. या दोन्ही राजकीय पक्षांना देण्यात आलेले सरकारी बंगले काढून घेण्याच्या हालचाली सुरु झाल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा… भाजप नेत्या पंकजा मुंडे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर मोठी रेड
दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे नाराज असून, ते भाजपसोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत शरद पवार यांना विचारले असता त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तर दुसरीकड अजित पवार हे नाराज नसून, ते आमच्यासोबतच आहेत. हे महत्त्वाच्या मुद्द्यावरून लक्ष भरकटवण्यासाठीची खेळी असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
Read also
हैही वाचा… “अजित पवार अस्वस्थ त्यामुळे काहीही होऊ शकतं”; शिंदेंच्या मंत्र्याचे मोठे विधान
हेही वाचा… “चंद्रकांत पाटील आलेला पाहुणा? त्यांचा रुबाब पुणेकर उतरवतील”; धंगेकरांची खोचक टीका
हेही वाचा… ‘माझं मुख्यमंत्रीपद वाचव म्हणून, ठाकरेंनी शिंदे यांच्याकडे केली होती गयावया’