शिवसेनेच्या सत्तासंघर्षामध्ये आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. काल रात्री उशिरा ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात एक मोठा खुलासा केला होता. ठाकरे म्हणाले होते की, “बंडखोरी करण्याच्या आधी एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते, म्हणाले होते कि शिवसेनेने भाजपसोबत सत्ता स्थापन केली नाही तर भाजप मला तुरुंगात टाकेल..” आदित्य ठाकरेंच्या या खुलाशानंतर आता शिवसेनेकडून ठाकरे गटाला प्रत्युत्तर देताना मोठा खुलासा करण्यात आला आहे.
शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी मोठा खुलासा करताना म्हटलं आहे की, “एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमदार जेव्हा सुरतला गेले होते तेव्हा उद्धव ठाकरे स्वतःच मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे यांना वारंवार फोन करत होते. उद्धव ठाकरे रडत होते आणि म्हणत होते कि एकनाथ परत ये..” दरम्यान आदित्य ठाकरे यांच्यावर सुद्धा म्हस्के यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, “ज्या प्रमाणे दिल्लीत एक पप्पू आहे त्या प्रमाणे महाराष्ट्रात एक नवीन पप्पू निर्माण झालाय..”
संजय राऊतांवर टीका करताना म्हस्के यांनी राउतांना गांडूळाची उपमा सुद्धा दिली आहे. आदित्य ठाकरे यांची परिस्थिती संजय राऊत यांच्या सारखी झाली आहे. त्यांना संजय राऊत यांचा सारखा मानसिक आजार झाला आहे. त्यांना उपचारांची गरज आहे. असेही खोचकपणे नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री कष्टकरी, शेतकरी यांचे अश्रू पुसणारे आहेत. ते मास लीडर आहेत. घरी मासा मेला म्हणून दार बंद करून बसणारे आम्ही नाहीत. आम्ही रडणारे नसून रडवणारे आहोत. आम्हाला नोटीस आली नाही ह्या लोकांना नोटीस आली होती. तेव्हा ते नरेंद्र मोदी यांच्या सोबत मिटिंगला बसले होते. आपल्या मित्रांची, नातेवाईकांच्या कोणत्या कंपनी ह्या परदेशात आहेत आणि कोणत्या नावाने आहेत हे आम्हला बोलायला लाऊ नका, सगळ्या चिठ्या आमच्याकडे आहे, असे म्हणत नरेश म्हस्के यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.
Read also
हेही वाचा… “उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणं अशक्य, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील.”
हेही वाचा… भाजप नेत्या पंकजा मुंडे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर मोठी रेड
हेही वाचा… राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते हसन मुश्रीफ यांना उच्च न्यायालयातून दिलासा..!
हेही वाचा… ‘एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड का केले?’; आदित्य ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट