भाजपच्या महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांमधील एक नाव म्हणजे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील. पुण्याच्या कोथरूड मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढल्यापासून चंद्रकांत पाटील यांची वेगवेगळ्या कारणांनी कायम चर्चा होत राहते. दोन दिवसांपूर्वी असंच एक वक्तव्य करून चंद्रकांत दादांनी आपली आणि पक्षाची चांगलीच गोची केलीय. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिंगावर घ्यायला निघालेले चंद्रकांत पाटील हे आपल्या सोबत शिवसेनेतील एक गट असल्याच देखील विसरले. वाद एवढा वाढला की आता खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना यामध्ये लक्ष घालावं लागलं.
हेही वाचा… उद्धव ठाकरे सिल्वर ओकवर आले होते कारण..; शरद पवारांचा खुलासा
एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना चंद्रकांत पाटील यांनी बाबरीच्या तोडकामाचा उल्लेख केला. “बाबरी पाडण्यासाठी कोणताही शिवसैनिक तेथे उपस्थित नव्हता तसेच याबद्दलची कोणतीही मीटिंग शिवसेना भवनात झाली नव्हती” असं वक्तव्य पाटील यांनी केलं. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून मोठा राजकीय धुरळा उडत आहे. उद्धव ठाकरे यांनी लागलीच पत्रकार परिषद घेत भाजपावर सडकून टीका केली तसेच मुख्यमंत्री शिंदेंना बाळासाहेबांची अवहेलना चालते का? असा प्रश्न देखील केला. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता दिसून आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रकांत पाटील यांनी केलेलं विधान हे त्यांचे वैयक्तिक असून पक्षाचा त्याच्याशी संबंध नसल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे एका बाजूला आक्रमक ठाकरे दुसरीकडे मित्रपक्ष शिंदेंच्या शिवसेनेतील नाराजी आणि भाजपने अंगाला लागू न देण्याची घेतलेली भूमिका, यामुळे पाटील हे चांगलेच कात्रीत सापडले.
हेही वाचा… राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार? अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा शपथविधी होणार?
दरवेळी प्रमाणे माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला म्हणत चंद्रकांत दादांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र असं वादग्रस्त विधान करण्याची त्यांची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी महापुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्याने त्यांच्यावर थेट शाही फेक करण्यात आली होती. आधीच कसबा विधानसभा मतदारसंघातील पराभवाचे खापर चंद्रकांत पाटील यांच्या डोक्यावर फोडण्यासाठी भाजपमधील एक गट यशस्वी ठरलाय. आता आणखीन एका वादग्रस्त विधानामुळे थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खडेबोल सुनावण्याची वेळ आली. “लोकसभा निवडणुक जवळ आली असताना अशी विधाने खपवून घेतली जाणार नाहीत” असा सज्जड दम शहा यांनी भरल्याची राजकीय वर्तुळात खरपूस चर्चा आहे.
चंद्रकांत पाटील यांची सुसंस्कृत आणि पक्षनिष्ठ कार्यकर्ता म्हणून ओळख आहे. मात्र आता वादग्रस्त विधानांमुळे नवीनच गोष्टीसाठी त्यांना ओळखल जाऊ लागल आहे. त्यामुळे दरवेळी गिरे तो भी टांग उपर असं म्हणून दंड थोपटणे बंद करणे गरजेचे आहे.
Read also
हेही वाचा… का हवीय राष्ट्रवादीला पुणे लोकसभेची जागा? काँग्रेसशी दोन हात करण्याची तयारी..
हेही वाचा… मोठी बातमी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची 1 मे रोजी हत्या करणार
हेही वाचा… 15 आमदारांसह भाजपमध्ये जाणार? अजित पवार म्हणाले..
हेही वाचा… ईडीचा पवार दाम्पत्याला दिलासा; अजित पवार, सुनेत्रा पवारांची नावं आरोपपत्रातून वगळली