शेतीच्या वादातून संगनमताने कुटूंबावर अन्याय झाल्यानंतर संतोष गायधने याच्या कुटुंबावर दबाव आणला जात आहे. खोट्या केसेस दाखल केल्या जात असून कुटुंब भीतीच्या छायेखाली जगतंय. अण्णा हजारेंसह वरीष्ठ पोलीस अन् मंत्र्यांनाही निवेदन दिलं तरी काहीच होत नसल्याने गायधने यांनी अण्णा हजारेंची हत्या करणार असा इशारा दिला.
हेही वाचा… “याचा परिणाम…”; राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
याबाबत मिळालेली माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्यातल्या निपाणी वडगाव इथल्या संतोष गायधने यांनी अण्णा हजारेंची हत्या करणार असा इशारा दिलाय. शेतीच्या वादातून संगनमताने कुटुंबावर अन्याय झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. शेतीच्या वादातून गटातील ९६ जणांनी कुटुंबावर दबाव आणला असून खोट्या केस दाखल करून भीती दाखवण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलं.
हेही वाचा… सर्वात मोठी बातमी, हसन मुश्रीफ यांना मुंबई सत्र न्यायालयाचा सर्वात मोठा झटका..!
कुटुंब भीतीच्या सावटाखाली जगत आहे. यासंदर्भात अण्णा हजारेंसह वरीष्ठ पोलीस आणि मंत्र्यांनाही निवेदन दिलं आहे. पण तरीही कारवाई होत नसल्यानं कुटुंबीय हतबल झालं आहे. राष्ट्रपतींकडे यामुळे आत्महत्येसाठी परवानगी मागितली असल्याचं संतोष गायधने यांनी म्हटलं. दरम्यान, अण्णा हजारे हे या प्रकरणात मॅनेज झाले असल्याचा आरोप गायधने यांनी केलाय. तसंच 1 मे रोजी अण्णा हजारेंची राळेगण सिद्धीत जावून हत्या करणार असा इशारा दिला.
Read also
हेही वाचा… 15 आमदारांसह भाजपमध्ये जाणार? अजित पवार म्हणाले..
हेही वाचा… ईडीचा पवार दाम्पत्याला दिलासा; अजित पवार, सुनेत्रा पवारांची नावं आरोपपत्रातून वगळली
हेही वाचा… उद्धव ठाकरे सिल्वर ओकवर आले होते कारण..; शरद पवारांचा खुलासा
हेही वाचा… राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार? अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा शपथविधी होणार?