महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांचा कोर्टाने सर्वात मोठा झटका दिला आहे. हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. मुंबई सेशन्स कोर्टाने मुश्रीफांचा अटकपूर्व जामीन नाकारला आहे. सेशन्स कोर्टाच्या या निकालानंतर आता हसन मुश्रीफ मुंबई हायकोर्टात जातात का, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा… 19 बंगले घोटाळा आरोपांच्या प्रकरणी मोठी कारवाई; रश्मी ठाकरे यांच्या अडचणी वाढणार?
हसन मुश्रीफ हे सध्या ईडी कारवाईच्या ससेमिऱ्यात अडकले आहेत. त्यांच्या कोल्हापुरातील कागल येथील घरी ईडी अधिकाऱ्यांनी दोन वेळा छापेमारी केली. या छापोमारीतून ईडी अधिकारी त्यांच्या घरातून काही महत्त्वाची कागदपत्रे घेऊन गेल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे ईडी अधिकाऱ्यांनी हसन मुश्रीफ यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. पण मुश्रीफांनी सुरवातीला चौकशीला जाणं टाळलं होतं. त्याऐवजी त्यांनी कोर्टाची पायरी चढत अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी पावलं उचलली. याप्रकरणी कोर्टाने त्यांना काही दिवसांसाठी दिलासा दिला. त्यानंतर हसन मुश्रीफ ईडी चौकशीला सामोरं गेले. या सगळ्या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे.
हेही वाचा…“स्वत:च काही दिवसांत बंडखोरी..”; शिंदे गटाच्या महिला खासदाराचे राजकीय भुकंप करणारे विधान
हसन मुश्रीफ यांनी ईडीच्या प्रकरणात आपल्याला अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी प्रयत्न केला होता. त्यासाठी त्यांनी मुंबई सेशन्स कोर्टाची पायरी चढली होती. विशेष म्हणजे हसन मुश्रीफ यांच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवादही करण्यात आला होता. त्यामुळे मुश्रीफांना जामीन मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. विशेष म्हणजे मुश्रीफांच्या जामीन अर्जावर दोन आठवड्यांपूर्वीच युक्तिवाद पूर्ण झाला होता. कोर्टाने याबाबतचा निकाल राखीव ठेवला होता. कोर्टाने ज्या तारखेला निकाल जाहीर करणार असल्याचं सांगितलं होतं त्यादिवशीही तारीख पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर आज अखेर हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर निकाल जाहीर करण्यात आला.
Read also
हेही वाचा… शरद पवारांचा उद्धव ठाकरेंवर रोष?; “आम्हाला विचारत घेतलं नाही”, म्हणत व्यक्त केली खंत
हेही वाचा… “माझ्या वक्तव्याचा ध चा म केला गेला”; चंद्रकांत पाटलांचा रोख नक्की कुणावर?
हेही वाचा… “बाबरी कुणी पाडली? एकही शिवसैनिकाचा हात नव्हता”; चंद्रकांत पाटलांचं खळबळजनक वक्तव्य