चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मस्जिद पाडण्यावरून केलेल्या वक्तव्यावरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे चांगलेच संतापले असून त्यांनी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. ज्या मस्तीमध्ये चंद्रकांत पाटील बोलले त्यांनी अडवाणींची मुलाखत ऐकावी आणि बाळासाहेबांचे राम मंदिर आंदोलनातील योगदान काय? हे समजून घ्यावे, असे यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
या मुद्द्यावरून चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घेण्यात यावा किंवा त्यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मस्जिदीच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विशेष पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधत म्हंटले की, “बाबरीच्या खंदकातून उंदीर बाहेर पडत आहेत. बाबरी पडली तेव्हा बरेच उंदीर पळाले. बाबरी शिवसैनिकांनीच पाडली. मिंधे आता चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेणार आहे की, स्वतः राजीनामे देणार आहे.”
हेही वाचा… Big News: महाराष्ट्र काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप, दोन आमदार करणार पक्षांतर !
बाबरी मस्जिद पाडण्यात आली, याबाबतची माहिती मी त्यावेळी बाळासाहेब यांना जाऊन सांगितली होती. जर ही मस्जिद ही शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला अभिमान आहे, असे त्यावेळी फोनवरून संजय राऊत यांच्याशी बोलताना बाळासाहेब म्हणाले होते. पण आता काही लोकं बाहेर येत आहेत. जे त्यावेळी सहलीला गेले होते, ते म्हणत आहेत की, आमच्या आजू-बाजूने गोळ्या गेल्या होत्या. कोण म्हणतंय आम्ही या तुरूंगात होतो, कोण म्हणतंय आम्ही त्या तुरूंगात होतो. मग इतके वर्ष का गप्प होतात? असा खोचक टोला यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून लगावण्यात आला आहे.
Read also
हेही वाचा… “बाबरी कुणी पाडली? एकही शिवसैनिकाचा हात नव्हता”; चंद्रकांत पाटलांचं खळबळजनक वक्तव्य
हेही वाचा… 19 बंगले घोटाळा आरोपांच्या प्रकरणी मोठी कारवाई; रश्मी ठाकरे यांच्या अडचणी वाढणार?
हेही वाचा…“स्वत:च काही दिवसांत बंडखोरी..”; शिंदे गटाच्या महिला खासदाराचे राजकीय भुकंप करणारे विधान