रायगड जिल्ह्यातील कोर्लई गावात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावाने 19 बंगले अधिकृतपणे बांधण्यात आले होते. पण नंतर आरोप करण्यात आल्यानंतर संबंधित बंगले जमीनदोस्त करण्यात आल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेला.
हेही वाचा… मुख्यमंत्री शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यानंतर राजकीय घडामोडींना वेग, अमित शाह लवकरच…
याच आरोपांप्रकरणी चौकशी सुरु असताना एक मोठी अपडेट समोर आली आहे. रेवदंडा पोलिसांनी कोर्लई गावातील माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक केली आहे. 19 बंगल्याच्या फसवणुकी प्रकरणात पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. रेवदंडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. फसवणूक आणि बनावट दस्तावेज बनवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज पोलिसांनी मोठी कारवाई करत थेट माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक केली आहे
उद्धव ठाकरे परिवाराच्या 19 बंगले घोटाळ्याप्रकरणी आज पोलिसांनी कोर्लईच्या प्रशांत मिसाळ या माजी सरपंचाची अटक केली आहे. 19 बंगल्यांचा हिशोब उद्धव ठाकरेंना द्यावाच लागणार, असा दावा किरीट सोमय्यांनी केला.
हेही वाचा… लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? काय म्हणाले शहराध्यक्ष प्रशांत जगताप?
“रश्मी उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात जमिनीचे व्यवहार झाले आहेत. रश्मी ठाकरे यांच्या नावावर कोकणात 19 बंगले होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेचा गैरवापर करत रश्मी ठाकरे यांचे नाव त्या व्यवहारातून कमी केले”, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. सोमय्यांनी याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.“रश्मी ठाकरे यांच्या जमीन व्यवहाराची कागदपत्रे गहाळ करण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी या जमीन व्यवहाराचे कागदपत्रे गहाळ करायला लावले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास झाला पाहिजे”, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती.
Read also
हेही वाचा…“स्वत:च काही दिवसांत बंडखोरी..”; शिंदे गटाच्या महिला खासदाराचे राजकीय भुकंप करणारे विधान
हेही वाचा… Big News: महाराष्ट्र काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप, दोन आमदार करणार पक्षांतर !