महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे दोन आमदार पक्षाची साथ सोडणार असल्याची माहिती मिळत आहे.
काँग्रेसचे हे आमदार भाजप-शिवसेनेमध्ये नाही तर चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात जाणार आहेत. याशिवाय एक अपक्ष आमदार आणि आपचे नेतेही चंद्रशेखर राव यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी ही माहिती दिली आहे.
हेही वाचा…“अजित पवार यांची गणना भाजपच्या अंधभक्तात होऊ नये ही आशा”
चंद्रशेखर राव यांनी काहीच महिन्यांपूर्वी तेलंगणा राष्ट्रसमिती अर्थात टीआरएसचं नाव बदलून बीआरएस म्हणजेच भारत राष्ट्र समिती केलं. राष्ट्रीय राजकारणात मोठी भूमिका निभावण्यासाठी चंद्रशेखर राव तयारी करत आहेत. काहीच दिवसांपूर्वी चंद्रशेखर राव यांनी नांदेडमध्ये सभा घेत महाराष्ट्रात एण्ट्री घेतली होती.
आता बीआरएसमध्ये प्रवेश करणारे काँग्रेसचे ते दोन आमदार कोण? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या विश्वासदर्शक ठरावावेळी 13 आमदार गैरहजर राहिले होते, तेव्हापासून काँग्रेसच्या या आमदारांबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
Read also
हेही वाचा… मुख्यमंत्री शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यानंतर राजकीय घडामोडींना वेग, अमित शाह लवकरच…
हेही वाचा… लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? काय म्हणाले शहराध्यक्ष प्रशांत जगताप?
हेही वाचा… उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! शिवसेना भवन, सर्व शाखा आणि निधी यावर शिंदे गटाकडून दावा
हेही वाचा… Big Breaking : महापालिका निवडणुका कधी होणार?; चंद्रकांत पाटील यांनी थेट सांगितला महिना..!