ठाण्यात ठाकरे गटाच्या एका महिलेला धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिला पदाधिकाऱ्याने शिंदे गटाच्या महिलांनी आपल्याला मारहाण केल्याचा दावा केला आहे. या महिलेला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत त्याचदरम्यान उद्धव ठाकरेंनी ठाण्यात रुग्णालयात जाऊन रोशनी शिंदे या महिलेची भेट घेतली
हेही वाचा…“आम्हाला परवानगी द्या, आम्ही दीपाली सय्यदला गोळ्या घालून मारू”
“गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने आपल्या सरकारबद्दल नपुंसक शब्द वापरल्याचं मी ऐकलं. त्याची प्रचिती काल आपल्याला आली आहे. सरकारच नपुंसक म्हटल्यावर कुणाकडून काय अपेक्षा करायची हा मोठा प्रश्न आहे. ठाण्याची ओळख महिलांचं रक्षण करणाऱ्या शिवसैनिकांचं ठाणं, धर्मवीर आनंद दिघेंचं ठाणं अशी आहे. पण ती पुसून गुंडांचं ठाणं असं करण्याचा प्रयत्न चालू झाला आहे. आता महिलांची गँग बनायला लागली, महिला गुंडगिरी करायला लागल्या तर देशाचं, राज्याचं, ठाण्याचं काय होणार हा एक सर्वसामान्य ठाणेकरांच्या मनातला प्रश्न आहे”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
हेही वाचा…भाजप, शिंदे गटाचे 3 नेते अडचणीत? फडणवीसचं करणार कारवाई?
“याचा अर्थ त्यांनी काहीही करायचं आणि आम्ही ऐकून घ्यायचं असा नाही. आत्ता म्हटलं तर या क्षणाला यांची गुंडगिरी आम्ही मुळासकट ठाण्यातून काय महाराष्ट्रातून उखडून फेकून दऊ शकतो. जर शिवसैनिक रस्त्यावर उतरले, तर ही गुंडगिरी उपटून टाकतील”, असंही उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.
Read also
हेही वाचा…भाजप-शिंदे गटात फूट? शिंदे गटाच्या मंत्र्याची भाजपवर टीका..
हेही वाचा…शिंदेंचा एक आमदार बंडाच्या तयारीत, ठाकरे गटात प्रवेश करणार !
हेही वाचा…“संजय शिरसाठांना गल्लीतलं काळ कुत्रेसुद्धा…,” सुषमा अंधारेंची जहरी टिका
हेही वाचा…“मग त्या महापुरूषांबद्दल का गौरवयात्रा काढण्यात आल्या नाहीत ?” अजित पवारांचा भाजपला खोचक सवाल