पुणे : राज्यात काही दिवसापासून आमदार संजय शिरसाठ आणि शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे. वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर संजय शिरसाठ यांच्यावर आता सुषमा अंधारे अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता राज्यात एक वेगळीच दिशा मिळाली असून यामुळे राजकीय वातावरण आणखीनच चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…देवेंद्र फडणवीस महिलांवर प्रचंड फिदा, भाजप आमदाराचं गजब विधान
संजय शिरसाठ यांच्याविरोधात अनेक ठिकाणी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु कुठेही माझी तक्रार दाखल करून घेण्यात आलेली नाही. सत्ताधारी पक्षातील शितल म्हात्रे प्रकरणात लोकांना तात्काळ अटक होते, गुन्हा दाखल होतो. गणेश बीडकर भाजपचे आहेत. नुसत्या त्यांच्या सांगण्यावरून त्यांचा डॉंन्सबारमधील व्हिडीओ व्हायरल झाला. यातच नाना पटोले यांच्या प्रकरणात तुम्ही वेगळा न्याय करता अन् इथे वेगळा न्याय करता. हा तुमचा दृटप्पटीपणा जगासमोर आणायचं असल्याचं सुषमा अंधारे यांनी सांगितलं.
हेही वाचा…डिग्री काय, मोदी हा माणूसच फेक आहे, 1992 साली डेव्हलप झालेला फॉंन्ट 1983 च्या सर्टिफिकेवर कसा ?
हे प्रकरण आता हाताबाहेर गेलं आहे. त्यामुळे मी माझा दावा कोर्टातून दाखल करणार आहे. यामध्ये मी ३ रूपयाची अब्रुनुकसानीची मागणी केली आहे. तसेच त्यावर संजय शिरसाठ यांच्या प्रतिक्रियावर देखील त्यांनी भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या की, शिरसाठ हे नाव कुणाला माहिती नव्हतं. तसेच सुषमा अंधारे यांच्यामुळेच संजय शिरसाठ यांचं नाव चर्चेत आलं असल्याचंही त्या म्हणाल्या. अंधार असून सुद्धा शिरसाठ यांना गल्लीतलं कुत्रं देखील ओळखत नाही. असा शाब्दिक टोलाही त्यांनी लगावला. यातच मला प्रसिद्धी मिळवायची असती तर मी लाखो, करोडो रूपयाची मागणी केली असती पण मी फक्त तीन रूपयाची मागणी केली असल्याचं सुषमा अंधारे यांनी सांगितलं.
Read also
हेही वाचा…“मग त्या महापुरूषांबद्दल का गौरवयात्रा काढण्यात आल्या नाहीत ?” अजित पवारांचा भाजपला खोचक सवाल
हेही वाचा…“समाजातील प्रत्येक व्यक्तींना उभारी देण्याची शिकवण शरद पवार साहेबांनी आम्हाला दिली”
हेही वाचा…“तर मी लाखो, करोडो रूपयाची मागणी केली असती, पण फक्त तीन रूपयाची मागणी केली”
हेही वाचा…“भाजपला नामशेष करणारा एकही राजकीय पक्ष देशात अस्तित्वात नाही”
हेही वाचा…“भिर्रर बारीच्या मैदानात मंगलदास बांदलांची गाडी सुसाट”, राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका