छत्रपती संभाजीनगर : मत पटत नसेल तर मतावर बोला पण महिलांना शिव्या देणे हे मी कधी सहन केले नसते. भगवा तुमच्या हातात शोभत नाही. फक्त सत्तेची हवा आहे. मी मुख्यमंत्री बननण्याचं वचन शिवसेनाप्रमुखांना दिले नव्हतं. मी अमित शहांना सांगितले होते पण ते ऐकले नाहीत. मग मनावर दगड ठेऊन बसले. मिंध्याचे ओझे घेऊन तुम्ही नेतृत्वात निवडणुका लढवणार का ? असा सवाल करीत आता बघा ही जनता कशी घाव घालते, भाजप नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही. असा जोरदार टिकास्त्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सोडला. त्यावर आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे.
हेही वाचा…“लोकसभेच्या निवडणुकीपुर्वी अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील”, शिवसेना आमदाराचा मोठा दावा
भाजपला नामशेष करणारा एकही पक्ष सध्या देशात अस्तिवात राहिलेला नाही आहे. व्यक्ती म्हणून तुमची काहीही ताकद नाही. या देशाच्या लोकांनी आणि जागतिक पातळीवरच्या लोकांनी मोदींच्या नेतृत्वाला मान्यता दिली आहे. त्यामुळे अशा प्रकाराच्या घोषणा आणि वल्गना करणं आता त्यांनी विसरून जावं. असा टोला रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
हेही वाचा…” आता भाजप नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही”, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
पुढे रावसाहेब दानवे यांनी खासदार संजय राऊतांवरही निशाणा साधला. पंतप्रधनांवर बोलतांना संजय राऊतांनी थोडं तरी तारतम्य ठेऊन बोलावं. जेव्हा एखादा विषय सार्वजनिक होतो आणि सार्वजनिक विषयाचा निर्णय होत नसेल तर अशा प्रकाराचे विषय कोर्टात जातात. अन् कोर्ट जो निर्णय देईल, तो सर्वांना मान्य करावं लागतो. परंतु आजकाल यांचा न्यायव्यवस्थेवर देखील विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे कुठल्याच निकालावर हे भरोसा ठेवायला तयार नाहीत. असा टोलाही रावसाहेब दानवे यांनी लगावला.
हेही वाचा…“तुमच्यात खरंच ताकद असेल तर सावरकरांना भारतरत्न देऊन दाखवा”, अजित पवारांचंं भाजपला आवाहन
सगळे विषय भरकटवून टाकले जात आहेत. अरविंद केजरीवाल जे बोलतायत त्यावर उत्तर नाही आणि हे आम्हाला विचारतात. आम्हाला शिकवायला जाऊ नका. आमच हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे नाही ते राष्ट्रीयत्व आहे. कश्मीरातील सैनिक औरंगजेब जो देशासाठी लढला तो औरंगजेब त्याला अतिरेक्यांनी मारला तो देशासाठी शहीद झाला तो आपला. अश्फाकुल्ला खान क्रांतिकारक आमचा. त्यांच्या बलिदानाचा संदर्भ. अनेकांनी देशासाठी सुख त्यागले. हे शक्तीप्रदर्शन. ही वज्रमूठ हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी. असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदेंवर चढवला. महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेत ते बोलत होते.
भाजपला नामशेष करणारा एकही राजकीय पक्ष देशात अस्तित्वात नाही आहे.
या देशातील लोकांकडून आणि जागतिक पातळीवरही मोदींच्या नेतृत्वाला मान्यता मिळाली आहे.@narendramodi @BJP4India @BJP4Maharashtra pic.twitter.com/5qe6hubyIw— Raosaheb Patil Danve (@raosahebdanve) April 3, 2023
Read also
हेही वाचा…“भिर्रर बारीच्या मैदानात मंगलदास बांदलांची गाडी सुसाट”, राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका
हेही वाचा…देवेंद्र फडणवीस महिलांवर प्रचंड फिदा, भाजप आमदाराचं गजब विधान
हेही वाचा…डिग्री काय, मोदी हा माणूसच फेक आहे, 1992 साली डेव्हलप झालेला फॉंन्ट 1983 च्या सर्टिफिकेवर कसा ?
हेही वाचा…“रिक्षावाल्याच्या हाताखाली काम कसं करणार ? मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंना शरद पवार साहेबांनीच गळ घातली”
हेही वाचा…“आता भाईजान उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांवर टिका करण्याची लायकी राहिली नाही”, नवनीत राणा