छत्रपती संभाजीनगर : आज गौरव यात्रा काढल्या जात आहे. माजी राज्यपालांसह पक्षातील नेते व प्रवक्त्यांनी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीमाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील अशा अनेक दिगज्जांचा यांचा अपमान केला. त्यावेळी या सरकारची दातखिळी बसली होती का, का नाही गौरव यात्रा काढल्या असा परखड सवाल करत तुमच्यात खरंच ताकद असेल तर सावरकरांना भारतरत्न देऊन दाखवा. असं आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं. छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या संयुक्त विराट सभेत अजित पवार बोलत होते.
हेही वाचा…“शिवसेना गटाचे नेते अद्वय हिरेंसह ३० जणांवर फसवणुक करण्याचा गुन्हा दाखल,” मालेगावची सभा झाली अन्…
आम्हाला सर्व महापुरुषांपबद्दल आदर आहे. आम्ही सर्व महापुरुषांसमोर नतमस्तक होतो. त्यांनी त्यावेळी काम केले म्हणून आपण हे दिवस पाहतो. त्यांच्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. मधल्या काळात काही स्वातंत्र्यवीर सावरकारांबद्दल काही बोललं गेले. त्या नंतर सर्वांनी त्याबाबत एक भूमिका घेऊन वातावरण शांत केले. पण जाणीवपूर्वक केंद्रीय दोन मंत्री व राज्यातील तीन मंत्री गौरव यात्रा काढत आहेत. गौरव यात्रेला आमचा विरोध नाही पण तुम्ही जे दुटप्पी राजकारण करतात. ते कधीच महाराष्ट्र विसरु शकत नाही, असे स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
हेही वाचा…“संजय राऊतांना दारूच्या नशेत ‘त्या’ व्यक्तीने धमकी दिली”, देवेंद्र फडणवीसांची माहिती
आम्ही नेहमी संविधानाच्या पुढे नतमस्तक होतो. पण देशात सध्या काय परिस्थिती आहे, हे सर्वांना माहित आहे. जर असंच घडत राहिलं तर देशात अस्थिरता निर्माण होईल. या सरकारचा पायगुण चांगला नाही. उद्धव ठाकरे यांच्या काळात दीड लाख लोक कामाला लागतील असे उद्योग राज्यात येत होते. पण हे सरकार आलं आणि सगळे उद्योग परराज्यात गेले. यात दोष कुणाला द्यायचा? ७५ हजार सरकारी नोकऱ्यांचे पदं भरणार म्हणाले पण कधी भरणार? हे काय सांगितलं नाही. तरुणांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार हे सरकार करत आहे. असा घणाघात देखील अजित पवार यांनी केला.
हेही वाचा…सुप्रिया सुळेताई..! “तेव्हा तुम्हाला तुमच्या गृहमंत्र्यांची निष्क्रियता दिसली नाही का ?” भाजपचा सुळेंना सवाल
दरम्यान, सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून सांगता मग मराठवाडा मुक्ती संग्राम सभेला मुख्यमंत्र्यांनी फक्त १३ मिनिटं वेळ दिला. मग हा मराठवाड्याच्या जनतेचा अपमान नाही का? आज इथं सभा होत असताना राज्यातले तीन मंत्री गौरव यात्रा काढतात. यात्रा काढायला हरकत नाही. मात्र, तुम्ही दुटप्पीपणाचं राजकारण करत आहात. सर्वोच्च न्यायालय म्हटलं की हे नपुंसक सरकार आहे. या सरकारला काही जनाची नाही तर मनाचीही वाटत नाही का? छत्रपतींचं नाव घेऊन तुम्ही सत्तेत आलात. पण त्यांचा अपमान झाला तेव्हा तुम्हाला राज्यपालांना थांबवता आलं नाही. असंही अजित पवार यांनी सांगितलं.
Read also
हेही वाचा…“अमित शहांना मी बाळासाहेबांची भाषा बोलू शकतो, मग भाजप मिंधेंचे काय चाटतय ?” उद्धव ठाकरेंचा घणाघात
हेही वाचा…“दारूच्या नशेत संजय राऊत यांचा मोबाईल नंबर कसा मिळाला?” सुनील राऊतांचा फडणवीसांना सवाल
हेही वाचा…“नजर सुधारा ताई आता स्वत:ची… ! चित्रा वाघ यांचा सुळेंवर हल्लाबोल,” वांग्यांचं चित्र ही टॅग केलं
हेही वाचा…“दोन दिग्गज आले, म्हणजे चर्चा तर होणारच,” शरद पवार नितीन गडकरींच्या भेटीला
हेही वाचा…“नारायण राणेंना त्यांच्या मुलाला माझ्याविरोधात उभं करायचंय पण..” ठाकरे गटाच्या आमदारांनी दिलं चॅंलेज