छत्रपती संभाजीनगर : भारताचा पंतप्रधान शक्तीमान असूनही तुम्हाला हिंदू जन आक्रोश यात्रा का काढवी लागते. सावरकर गौरव यात्रा जरूर काढा आता हिंदू जनाक्रोश मोर्चा शिवसेनाभवनाकडे आणला. मालेगावाच्या सभेनंतर माझ्यावर हिंदुत्व सोडल्याचा आरोप झाला. परंतु मी हिंदूत्व सोडल्याचं एक उदाहरण द्या, मी तुम्हाला माझं तोंड दाखवणार नाही. परंतु काॅंग्रेससोबत गेलो तर हिंदुत्व सोडले असेल तर मुक्ती मोहम्मद सोबत गेल्यावर तुम्ही काय सोडले? त्यामुळे तुमची ही खरी मस्ती संपवण्यासाठीच आजची महाविकास आघाडीची ही वज्रमूठ असल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. मविआकडून छत्रपती संभाजीनगर येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या सभेत ठाकरेंनी भाजप आणि शिंदेंवर जोरदार निशाणा साधला.
हेही वाचा…“संजय राऊतांना दारूच्या नशेत ‘त्या’ व्यक्तीने धमकी दिली”, देवेंद्र फडणवीसांची माहिती
अनेक युवक युवतींनी पदवी मिळवली आहे. हल्ला डॉक्टरेट पण विकत घेता येते. पण पदवी दाखवून पण किंमत नाही, पण पंतप्रधानांची पदवी मागितली तर दंड होतो. कुठली पदवी आहे. महाविद्यालयाला पण पंतप्रधान आपले असल्याचा अभिमान वाटायला हवा. पंतप्रधान जिथे शिकले त्यांना अभिमान वाटायला हवा. मविआ सरकार तुम्हाला पसंत होत का? तिघे एकत्र आले पण सत्ता गेल्यावर पण आम्ही घट्टपणे एकत्रच आहोत. अमित शहा आरोप करुन गेले, मी विचारतो अमित शहांना मी बाळासाहेबांची भाषा बोलू शकतो मग भाजप मिंधेंचे काय चाटतय. चांगली चाललेली सरकारे पाडायची मग तेव्हा तुम्ही नितिश कुमारांचे काय चाटत होतात? मोदी म्हणतात त्यांची प्रतिमा खराब करतायत. मग आमची प्रतिमा नाही का? तुमचा अपमान म्हणजे ओबीसींचा अपमान? विरोधी पक्षातील लोकांना त्रास दिला जातोय. तुम्ही मेघालयात संगमावर भष्टाचाराचे आरोप केले होते आता तुम्ही संगमांचे काय चाटताय? असा सवालही त्यांनी केला.
हेही वाचा…सुप्रिया सुळेताई..! “तेव्हा तुम्हाला तुमच्या गृहमंत्र्यांची निष्क्रियता दिसली नाही का ?” भाजपचा सुळेंना सवाल
भ्रष्ट दिसला की घे पक्षात सगळे भ्रष्ट तुमच्या पक्षात मग हा भारतीयांचा अपमान आहे. भ्रष्टाचारी पक्ष म्हणून नाव ठेवा. आता भाजपच्या व्यासपीठावर सगळे संधी साधू. तुमचे हिंदुत्व आम्ही मानायला तयार नाही. लोकशाही संपवायची इतरांना ठेवायचे, तुरूंगात टाकायचे. सावरकरांचे स्वप्न अखंड हिंदुस्थानात त्यांच्यात हिंमत आहे भाजपची. आम्ही जमिनीवरचे माणसं पाकव्याप्त जमीन मिळून दाखवा. सरदार सरोवर बांधले मराठवाडा वल्लभभाई पटेलांमुळे. नुसत पोलाद जमा केले पण तुमच्या रक्तात ते उतरले असेल तर पाकव्याप्त मिळून दाखवा. असंही ते म्हणाले.
हेही वाचा…“संभाजीनगर दंगलीमागे खासदार इत्मियाज जलील यांचा हात..!” शिवसेना आमदाराचा खळजनक आरोप
दरम्यान, पुढे बोलतांना ते म्हणाले की, मविआ काळात केंद्र सरकारने मालक धार्जिणा कायदा आणला तो आपण महाराष्ट्रात लागू होऊ दिला नाही आता मिंधे तो लागू करण्याचा प्रयत्नात. कामगारांच्या कष्टावर देश उभा आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे सांगतात दिवाळी काळात गंगापूरला आलो होतो. अवकाळी पाऊस झाला. आपण बीड पॅटर्न आणण्याचा प्रयत्न करत होतो. शेतकऱ्यांची थट्टा हे सरकार करतय. विम्याचे पैसे मिळत नाही. मविआ काळात जे बोललो ते केले. पीक कर्जमुक्ती मविआ आल्यावर केली. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार आता मिळत नाही. मी कोरोना काळात जे घरात बसून केले ते तुम्ही सुरत गुवाहटीला जाऊन करु शकला नाहीत. मालेगावात कांदा उत्पादक शेतकरी. एका कांद्याला ५० खोके दिलेत पण शेतकऱ्यांना काहीच नाही.
Read also
हेही वाचा…“दारूच्या नशेत संजय राऊत यांचा मोबाईल नंबर कसा मिळाला?” सुनील राऊतांचा फडणवीसांना सवाल
हेही वाचा…“नजर सुधारा ताई आता स्वत:ची… ! चित्रा वाघ यांचा सुळेंवर हल्लाबोल,” वांग्यांचं चित्र ही टॅग केलं
हेही वाचा…“दोन दिग्गज आले, म्हणजे चर्चा तर होणारच,” शरद पवार नितीन गडकरींच्या भेटीला
हेही वाचा…“नारायण राणेंना त्यांच्या मुलाला माझ्याविरोधात उभं करायचंय पण..” ठाकरे गटाच्या आमदारांनी दिलं चॅंलेज
हेही वाचा…“शिवसेना गटाचे नेते अद्वय हिरेंसह ३० जणांवर फसवणुक करण्याचा गुन्हा दाखल,” मालेगावची सभा झाली अन्…