छत्रपती संभाजीनगर : मत पटत नसेल तर मतावर बोला पण महिलांना शिव्या देणे हे मी कधी सहन केले नसते. भगवा तुमच्या हातात शोभत नाही. फक्त सत्तेची हवा आहे. मी मुख्यमंत्री बननण्याचं वचन शिवसेनाप्रमुखांना दिले नव्हतं. मी अमित शहांना सांगितले होते पण ते ऐकले नाहीत. मग मनावर दगड ठेऊन बसले. मिंध्याचे ओझे घेऊन तुम्ही नेतृत्वात निवडणुका लढवणार का ? असा सवाल करीत आता बघा ही जनता कशी घाव घालते, भाजप नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही. असा जोरदार टिकास्त्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सोडला.
हेही वाचा…“नारायण राणेंना त्यांच्या मुलाला माझ्याविरोधात उभं करायचंय पण..” ठाकरे गटाच्या आमदारांनी दिलं चॅंलेज
सगळे विषय भरकटवून टाकले जात आहेत. अरविंद केजरीवाल जे बोलतायत त्यावर उत्तर नाही आणि हे आम्हाला विचारतात. आम्हाला शिकवायला जाऊ नका. आमच हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे नाही ते राष्ट्रीयत्व आहे. कश्मीरातील सैनिक औरंगजेब जो देशासाठी लढला तो औरंगजेब त्याला अतिरेक्यांनी मारला तो देशासाठी शहीद झाला तो आपला. अश्फाकुल्ला खान क्रांतिकारक आमचा. त्यांच्या बलिदानाचा संदर्भ. अनेकांनी देशासाठी सुख त्यागले. हे शक्तीप्रदर्शन. ही वज्रमूठ हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी. असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदेंवर चढवला. महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेत ते बोलत होते.
हेही वाचा…“शिवसेना गटाचे नेते अद्वय हिरेंसह ३० जणांवर फसवणुक करण्याचा गुन्हा दाखल,” मालेगावची सभा झाली अन्…
भ्रष्ट दिसला की घे पक्षात. सगळे भ्रष्ट तुमच्या पक्षात मग हा भारतीयांचा अपमान आहे. भ्रष्टाचारी पक्ष म्हणून नाव ठेवा. आता भाजपच्या व्यासपीठावर सगळे संधी साधू. तुमचे हिंदुत्व आम्ही मानायला तयार नाही. लोकशाही संपवायची इतरांना ठेवायचे, तुरूंगात टाकायचे. सावरकरांचे स्वप्न अखंड हिंदुस्थानात त्यांच्यात हिंमत आहे भाजपची. आम्ही जमिनीवरचे माणसं पाकव्याप्त जमीन मिळून दाखवा. सरदार सरोवर बांधले मराठवाडा वल्लभभाई पटेलांमुळे. नुसत पोलाद जमा केले पण तुमच्या रक्तात ते उतरले असेल तर पाकव्याप्त मिळून दाखवा. असंही ते म्हणाले.
हेही वाचा…“संजय राऊतांना दारूच्या नशेत ‘त्या’ व्यक्तीने धमकी दिली”, देवेंद्र फडणवीसांची माहिती
दरम्यान, इस्रायलचे उदाहरण. वाळवंटात शेती. आपल्या देशात न्याय व्यवस्था बुडाखाली घेण्यासाठी भाजपची वाटचाल. ज्या दिवशी न्याय यांच्या बुडाखाली जाईल त्यादिवशी लोकशाही संपेल. नेतान्याहू मोदींचे मित्र. नेतान्याहूने प्रयत्न केला लाखो नागरिक रस्त्यावर उतरले. पोलीस प्रमुख संपावर गेले. लोकांच्या रेट्यामुळे नेतान्याहूना कायदा परत घेतला ही लोकशाही. तुमच्या मागे आम्ही येणार नाही. जनता मत देते मग जनतेला पंतप्रधानांवर वचक ठेवावा लागेल. आम्ही संविधानाचे रक्षण करणार ती ताकद आपल्यात आहे. असंही ते म्हणाले.
Read also
हेही वाचा…“तुमच्यात खरंच ताकद असेल तर सावरकरांना भारतरत्न देऊन दाखवा”, अजित पवारांचंं भाजपला आवाहन
हेही वाचा…“अमित शहांना मी बाळासाहेबांची भाषा बोलू शकतो, मग भाजप मिंधेंचे काय चाटतय ?” उद्धव ठाकरेंचा घणाघात
हेही वाचा…“दारूच्या नशेत संजय राऊत यांचा मोबाईल नंबर कसा मिळाला?” सुनील राऊतांचा फडणवीसांना सवाल
हेही वाचा…“नजर सुधारा ताई आता स्वत:ची… ! चित्रा वाघ यांचा सुळेंवर हल्लाबोल,” वांग्यांचं चित्र ही टॅग केलं
हेही वाचा…“दोन दिग्गज आले, म्हणजे चर्चा तर होणारच,” शरद पवार नितीन गडकरींच्या भेटीला