मुंबई : छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेतून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना खरपुस समाचार घेतला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडलं. आता याच पार्श्भूमीवर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे.
हेही वाचा…“नजर सुधारा ताई आता स्वत:ची… ! चित्रा वाघ यांचा सुळेंवर हल्लाबोल,” वांग्यांचं चित्र ही टॅग केलं
काॅंग्रेस-राष्ट्रवादी काॅंग्रेससोबत जाणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आता भाईजान उद्धव ठाकरे असे संबोधिले पाहिजे. ३३ महिने मुख्यमंत्री असताना औरंगाबादचे नाव ते संभाजीनगर करू शकले नाही. ३३ महिन्याच्या सरकारमध्ये अमरावती दंगा झाला, तेव्हा का वेदना झाल्या नाहीत ? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका करण्याची लायकी नाही. ज्यांनी फेसबुकच्या माध्यमातून सरकार चालवली ते काय पंतप्रधानांवर टिका करणार ? पंतप्रधानांवर टिका करणे योग्य नाही, त्याला उत्तर देण्यासाठी देशाचे आणि महाराष्ट्राचे लोक सक्षम असल्याचंही नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टिका करतांना म्हटलं.
हेही वाचा…“दोन दिग्गज आले, म्हणजे चर्चा तर होणारच,” शरद पवार नितीन गडकरींच्या भेटीला
तत्पुर्वी उद्धव ठाकरे यांनी वज्रमुठ सभेतून मोदींवर निशाणा साधला. सावरकर गौरव यात्रा जरुर काढा आता हिंदू जनाक्रोश मोर्चा शिवसेनाभवनाकडे आणला. या देशाचा पंतप्रधान शक्तीमान असूनही तुम्हाला हिंदू जन आक्रोश यात्रा का काढवी लागते. मालेगावात सभा झाली. माझ्यावर हिंदुत्व सोडल्याचा आरोप. मला एक उदाहरण द्या मी पुन्हा तोंड दाखवणार नाही. घटनेची शपथ घेतल्यावर जातीय तेढ निर्माण करतात. मी काँग्रेस सोबत गेलो तर हिंदुत्व सोडले असेल तर मुफ्ती मोहम्मद सोबत गेल्यावर तुम्ही काय सोडले. तुम्ही म्हणाल तेच खर ही मस्ती संपविण्यासाठी मविआची वज्रमूठ. अनेक युवक युवतींनी पदवी मिळवली आहे हल्ली डाॅक्टरेट पण विकत घेता येते. पण पदवी दाखवून पण किंमत नाही, पण पंतप्रधानांची पदवी मागितली तर दंड होतो. कुठली पदवी आहे, महाविद्यालयाला पण पंतप्रधान आपले असल्याचा अभिमान वाटायला हवा. पंतप्रधान जिथे शिकले त्यांना अभिमान वाटायला हवा. असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
हेही वाचा…“नारायण राणेंना त्यांच्या मुलाला माझ्याविरोधात उभं करायचंय पण..” ठाकरे गटाच्या आमदारांनी दिलं चॅंलेज
दरम्यान, मविआ सरकार तुम्हाला पसंत होत का? (प्रचंड प्रतिसाद). तिघे एकत्र आले पण सत्ता गेल्यावर पण आम्ही घट्टपणे एकत्रच आहोत. अमित शहा आरोप करुन गेले, मी विचारतो अमित शहांना मी बाळासाहेबांची भाषा बोलू शकतो मग भाजप मिंधेंचे काय चाटतय. चांगली चाललेली सरकारे पाडायची मग तेव्हा तुम्ही नितिश कुमारांचे काय चाटत होतात? मोदी म्हणतात त्यांची प्रतिमा खराब करतायत. मग आमची प्रतिमा नाही का? तुमचा अपमान म्हणजे ओबीसींचा अपमान? विरोधी पक्षातील लोकांना त्रास दिला जातोय. तुम्ही मेघालयात संगमावर भष्टाचाराचे आरोप केले होते आता तुम्ही संगमांचे काय चाटताय. असा घणाघात देखील त्यांनी लगावला.
Read also
हेही वाचा…“लोकसभेच्या निवडणुकीपुर्वी अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील”, शिवसेना आमदाराचा मोठा दावा
हेही वाचा…” आता भाजप नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही”, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
हेही वाचा…“तुमच्यात खरंच ताकद असेल तर सावरकरांना भारतरत्न देऊन दाखवा”, अजित पवारांचंं भाजपला आवाहन
हेही वाचा…“अमित शहांना मी बाळासाहेबांची भाषा बोलू शकतो, मग भाजप मिंधेंचे काय चाटतय ?” उद्धव ठाकरेंचा घणाघात
हेही वाचा…“दारूच्या नशेत संजय राऊत यांचा मोबाईल नंबर कसा मिळाला?” सुनील राऊतांचा फडणवीसांना सवाल