पुणे : महाराष्ट्रात प्रत्येक समाजात आर्थिक आणि दुर्बल घटक असतात. अनंत अडचणींना तोंड देऊन अनेकजण काम करतात. समाजातील अशा व्यक्तींना उभारी देणे हे समाजसुधारणेचे काम आहे. ही शिकवण आदरणीय शरद पवार साहेबांनी आम्हाला दिली आहे. समाजातील वेगवेगळ्या वर्गाने ज्या-ज्या वेळी आरक्षणाची मागणी केली त्यावेळी पवार साहेब आवर्जून सोबत उभे राहिले. त्याचप्रमाणे ब्राम्हण समाजाच्या प्रश्नांना न्याय मिळण्यासाठी मकरंद कुलकर्णी यांनी मोठे कष्ट घेतले आहेत. खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना सुविधा मिळाव्यात हा त्यांनी ध्यास घेतला. त्यांनी केलेला प्रयत्न हा केवळ ब्राम्हण समाजासाठी नसून सर्व समाजासाठींचा आहे, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय. आंतरराष्ट्रीय ब्राम्हण संघटनेच्या वतीने आज राष्ट्रवादी भवन, मुंबई इथे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…“रिक्षावाल्याच्या हाताखाली काम कसं करणार ? मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंना शरद पवार साहेबांनीच गळ घातली”
महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन अर्थमंत्री अजितदादांच्या माध्यमातून समाजातील शोषित वर्गाला निधी देण्याचे काम झाले. अजित पवार यांनी मंजूर केलेल्या पन्नास कोटींच्या निधीचा फायदा खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना झाला आहे. सत्तेत असताना लोकांकडून सत्कार होत असतात, मात्र महाविकास आघाडी सरकार जाऊन नऊ महिन्यांहून अधिक काळ उलटला असला तरी केलेल्या कामांचे समाधान व्यक्त करण्यासाठी सर्व लोक एकत्र आले,जंयत पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. जनआशीर्वादाने मिळालेल्या पदाचा उपयोग हा सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी झाला पाहिजे, ही शिकवण आदरणीय शरद पवार साहेबांनी दिली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील सर्व घटकांना सोबत नेण्याचा प्रयत्न झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानावर आधारित काम करताना सारथी, बार्टी, महाज्योती अशा विविध संस्थांच्या माध्यमातून अनेक समाजांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा…“आता भाईजान उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांवर टिका करण्याची लायकी राहिली नाही”, नवनीत राणा
पुढे अजित पवार म्हणाले की, महापुरुषांनी कधीही कोणत्याही जाती-धर्माबद्दल आकसाची भावना ठेवली नाही. हीच शिकवण आपण पुढे नेली पाहिजे. एखादे काम करताना त्यात सातत्य टिकले पाहिजे. जोवर आपण हाती घेतलेल्या कामात यश संपादित करत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहिले पाहिजे. महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात तीन पक्ष काम करत होते. हा सत्कार कोणाचा वैयक्तिक नसून सामुदायिक सत्कार आहे. या समारोहास पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, युवक प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, आंतरराष्ट्रीय ब्राम्हण संघटनेचे विजय जमदग्नी, गजानन जोशी, बाळासाहेब पांडे, मनोज गाजरे, संजय सुपेकर, प्रदिप अष्टेकर, स्वानंद गोसावी, यशवंत कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
Read also
हेही वाचा…“तर मी लाखो, करोडो रूपयाची मागणी केली असती, पण फक्त तीन रूपयाची मागणी केली”
हेही वाचा…“भाजपला नामशेष करणारा एकही राजकीय पक्ष देशात अस्तित्वात नाही”
हेही वाचा…“भिर्रर बारीच्या मैदानात मंगलदास बांदलांची गाडी सुसाट”, राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका
हेही वाचा…देवेंद्र फडणवीस महिलांवर प्रचंड फिदा, भाजप आमदाराचं गजब विधान
हेही वाचा…डिग्री काय, मोदी हा माणूसच फेक आहे, 1992 साली डेव्हलप झालेला फॉंन्ट 1983 च्या सर्टिफिकेवर कसा ?