मुंबई : सर्वसामान्यांचं सरकार म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने लोकांना सांगत आहेत. परंतु ते सर्वसामान्यांसाठी काहीच करताना दिसत नाहीत. असा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांकडून केला जातोय. यातच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे सातत्याने यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधतांना दिसत आहेत. आज पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
हेही वाचा…डिग्री काय, मोदी हा माणूसच फेक आहे, 1992 साली डेव्हलप झालेला फॉंन्ट 1983 च्या सर्टिफिकेवर कसा ?
अजित पवार म्हणाले की, जाहिरातींचा खर्च आता ५५ कोटी नाही, तर १०० कोटी रूपयांवर जाणार आहे. कारण सध्या सत्ताधाऱ्यांकडे काही मुद्दे राहिलेले नाहीत. लोकांनी या सरकारला विसरू नये म्हणून जनतेच्याच टॅक्सरूपाने आलेल्या पैशाने मस्तपैकी जाहीरातबाजी सुरू आहे. असा घणाघात अजित पवार यांनी राज्य सरकारवर लगावला आहे.
हेही वाचा…“रिक्षावाल्याच्या हाताखाली काम कसं करणार ? मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंना शरद पवार साहेबांनीच गळ घातली”
गौरवयात्रा काढता मग माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि भाजपचे मंत्री, प्रवक्ते, आमदार यांनी इतर महापुरूषांबाबत वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्ये केली. त्यावेळी त्यांना का थांबवण्यात आले नाही. त्या महापुरूषांबद्दल का गौरवयात्रा काढण्यात आल्या नाहीत ? हे निव्वळ राजकारण आहे अशी नाराजी अजित पवार यांनी व्यक्त केला.
हेही वाचा…“आता भाईजान उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांवर टिका करण्याची लायकी राहिली नाही”, नवनीत राणा
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या काळात दीड लाख लोक कामाला लागतील असे उद्योग राज्यात येत होते. पण हे सरकार आलं आणि सगळे उद्योग परराज्यात गेले. यात दोष कुणाला द्यायचा? ७५ हजार सरकारी नोकऱ्यांचे पदं भरणार म्हणाले पण कधी भरणार? हे काय सांगितलं नाही. तरुणांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार हे सरकार करत आहे. सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून सांगता मग मराठवाडा मुक्ती संग्राम सभेला मुख्यमंत्र्यांनी फक्त १३ मिनिटं वेळ दिला. मग हा मराठवाड्याच्या जनतेचा अपमान नाही का? असा सवालही त्यांनी केला.
Read also
हेही वाचा…“समाजातील प्रत्येक व्यक्तींना उभारी देण्याची शिकवण शरद पवार साहेबांनी आम्हाला दिली”
हेही वाचा…“तर मी लाखो, करोडो रूपयाची मागणी केली असती, पण फक्त तीन रूपयाची मागणी केली”
हेही वाचा…“भाजपला नामशेष करणारा एकही राजकीय पक्ष देशात अस्तित्वात नाही”
हेही वाचा…“भिर्रर बारीच्या मैदानात मंगलदास बांदलांची गाडी सुसाट”, राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका
हेही वाचा…देवेंद्र फडणवीस महिलांवर प्रचंड फिदा, भाजप आमदाराचं गजब विधान