शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात गोष्ट वेगळी होती. आम्ही विश्वासघाताचा बदला घेतला. अमित शाह यांनी सांगितले होते. एक वेळ आम्ही सत्तेतून बाजूला राहू, मात्र विश्वासघात सहन करणार नाही. असं विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. यावर राजकीय वर्तुळातून उलटसुलट पडसाद उमटत आहे.
याचवेळी शिंदे गटाचे नेते व मंत्री गुलाबराव पाटील यांनी बावनकुळेंच्या विधानाला आम्ही महत्व देत नसल्याचं म्हटलं आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथे माध्यमांशी संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानावर भाष्य केलं आहे.
पाटील म्हणाले,चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले त्याला मी महत्त्व देत नाही. कारण तो त्यांचा स्पेसिफिक विचार आहे. ते भाजपचे नेते आहेत. आम्ही फक्त जी प्रॉपर युती होती, त्या युतीबरोबर जाण्याचा प्रयत्न केला असं गुलाबराव पाटील म्हणालेत. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विश्वासघाताचा बदला घेतला या वक्तव्यावर गुलाबराव पाटील यांना प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांनी हे विधान केलं आहे.
Read also
हेही वाचा…शिंदेंचा एक आमदार बंडाच्या तयारीत, ठाकरे गटात प्रवेश करणार !
“आम्हाला परवानगी द्या, आम्ही दीपाली सय्यदला गोळ्या घालून मारू”
हेही वाचा…“संजय शिरसाठांना गल्लीतलं काळ कुत्रेसुद्धा…,” सुषमा अंधारेंची जहरी टिका
हेही वाचा…“मग त्या महापुरूषांबद्दल का गौरवयात्रा काढण्यात आल्या नाहीत ?” अजित पवारांचा भाजपला खोचक सवाल
हेही वाचा…“समाजातील प्रत्येक व्यक्तींना उभारी देण्याची शिकवण शरद पवार साहेबांनी आम्हाला दिली”