मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत सातत्याने शिंदे गटातील नेत्यांवर टिका करतांना दिसत आहेत. त्यावर शिंदे गटाच्या नेत्यांकडून हे जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण शिवसेनेच्या दोन्ही गटामध्ये जास्त फिरतांना दिसत आहेत. यातच आता शिंदे गटातील आमदारांनी संजय राऊतांना आरोपाच्या फेऱ्यामध्ये घेरलं आहे.
हेही वाचा…कसब्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पुण्यात भाजपची तिरकी चाल, ‘या’ बड्या नावासाठी चाचपणी?
संजय राऊतांनी इव्हीएमचा विषय काढला होता. त्यावर मागच्या वेळेला जेव्हा १८ खासदार शिवसेनेचे निवडून आले तेव्हा संजय राऊत यांना इव्हीएमचा प्रश्न पडला नाही का? आता त्यांना जाग कशी आली? ते रात्रभर झोपत नाही, काही विचार करत बसतात आणि सकाळी सांगत असतात. एवढं काय मनावर घ्यायची गरज नाही. आता हे हळूहळू लोकांनाही कळायला लागले आहे. असं शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…अदाणींबाबत केलेल्या शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले की,,,
मंत्री दिपक केसरकरांनी देखील संजय राऊतांवर टिका केली आहे. संजय राऊत हे पाप करतात. ते लोकांची मनं दुखावतात आणि राऊत हे रोजच करतात. त्यामुळे त्यांनी गंगेत जाऊन स्नान केलं पाहिजे. पाप मुक्त झालं पाहिजे. खरं तर मुळातच ठाकरे फॅमिलीशी लॉयल नाहीत. ते पवारांचे आणि पवारांसाठीच काम करतात. राष्ट्रवादीसाठी काम करतात. तर राष्ट्रवादीने त्यांना जी ड्युटी दिलेली होती, शिवसेना फोडायची ती त्यांनी केलेली आहे. त्याच्यामुले माझी खात्री आहे की त्यांचे आता समाधान झालेले असेल. आता त्यांनी शांत राहणं योग्य होईल असा टोलाही केसरकारांनी राऊतांना हाणला.
Read also
हेही वाचा…“नाना पटोलेंमुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले”, काॅंग्रेस नेत्याचाच पटोलेंवर गंभीर आरोप
हेही वाचा…“राष्ट्रवादीने अगोदर भुजबळ, मग नारायण राणेंना अन् त्यानंतर राज ठाकरेंना शिवसेनेतून फोडलं”
हेही वाचा…“नारायण राणेंना अटक होऊ शकते तर उद्धव ठाकरेंना का अटक होऊ शकत नाही” ?
हेही वाचा…” ते आता काॅंग्रेस नेत्यांना कळून चुकलंय,” भाजप आमदाराने निवडणुकीच्या आधी मीठ चोळलं
हेही वाचा…आघाडीच्या पुण्यातील ‘वज्रमुठ’ सभेचं ठिकाण ठरलं, अजित पवारांकडे जबाबदारी, लाखांच्यावर गर्दी जमणार ?