मुंबई : राष्ट्रवादीने सर्वात आधी छगन भुजबळ, मग नारायण राणे आणि त्यानंतर राज ठाकरे यांना शिवसेनेतून फोडलं. असा गंभीर आरोप शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटलांनी केला आहे. गुलाबराव पाटलांनी यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील प्रखर शब्दात टिका केली आहे. त्यामुळे आता त्यावर विरोधक काय प्रतिक्रिया देणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…“रावण राज्य चालवणारे अयोध्येला चालले”, आदित्य ठाकरेंच्या टिकेला मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर, म्हणाले की,,,,,
ज्या काॅंग्रेसने आम्हाला तुडवलं, ज्या काॅंग्रेसने आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला. ज्या राष्ट्रवादी काॅंग्रेसने तीन वेळा आमची शिवसेना फोडली. त्यांच्यासोबत तुम्ही मांडीला मांडी लावून बसला आहात. राष्ट्रवादीने तीन वेळा आमचा पक्ष फोडला. सर्वात आधी छगन भुजबळ, मग नारायण राणेंना आणि त्यानंतर राज ठाकरे यांना फोडलं. आज तुम्ही त्याच काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांसोबत जाऊन बसला आहात. असंही गुलाबराव पाटलांनी म्हटलंय.
हेही वाचा…“ना पक्षात एकमत, ना महाविकास आघाडीमध्ये, 2024 ला आयेगा तो मोदीही”, भाजपने राष्ट्रवादीला डिवचलं
दरम्यान, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेससोबत सरकार नको म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडाळी केली. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत युतीत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आपल्या जाहीर सभांमधून ठाकरे गटाच्या नेत्यांकडून शिंदेंवर जोरदार प्रहार करण्यात आला. ५० खोके एकदम ओके अशी म्हणच त्यानंतर तयार झाली. तर शिंदे गटाकडून देखील यावर पलटवार करण्यात आला.
Read also
हेही वाचा…“नारायण राणेंना अटक होऊ शकते तर उद्धव ठाकरेंना का अटक होऊ शकत नाही” ?
हेही वाचा…” ते आता काॅंग्रेस नेत्यांना कळून चुकलंय,” भाजप आमदाराने निवडणुकीच्या आधी मीठ चोळलं
हेही वाचा…आघाडीच्या पुण्यातील ‘वज्रमुठ’ सभेचं ठिकाण ठरलं, अजित पवारांकडे जबाबदारी, लाखांच्यावर गर्दी जमणार ?
हेही वाचा…कसब्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पुण्यात भाजपची तिरकी चाल, ‘या’ बड्या नावासाठी चाचपणी?
हेही वाचा…अदाणींबाबत केलेल्या शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले की,,,