मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशातील लोकशाही नाही तर घराणेशाही धोक्यात आली आहे. असा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काॅंग्रेसवर चढवला आहे. खासदार राहुल गांधी यांच्या टिकेला त्यांनी उत्तर प्रदेश येथील एका सभेला संबोधित करतांना उत्तर दिलं आहे. त्यावरून आता भाजपचे नेते आणि मंत्री रविंद्र चव्हाण यांनी देखील विरोधकांना इशारा दिला आहे.
हेही वाचा…पुणे लोकसभा पोटनिवडणुक बिनविरोध होणार की थेट लढत ? अजित पवारांनी स्पष्टचं सांगितलं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अंत्योदयाचे स्वप्न साकार होत आहे. जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत आहे. नव्या भारतात जातीवाद, परिवारवाद आणि तुष्टीकरणाच्या राजकारणाला थारा नाही. त्यामुळे आता आपली राजकीय पोळी भाजली जाणार नाही हे काॅंग्रेस नेत्यांना कळून चुकलं आहे. मोदी यांनी आपल्या कामातून भारतीयांचा अढळ विश्वास जिंकला आहे. म्हणनूच पुन्हा पुन्हा मोदी यांना साथ देण्याचा निर्धार केला आहे. भारतातील प्रत्येक जण म्हणतोय. इस बार, ३०० के पार मोदी सरकार असंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“थोडी नैतिकता दाखवून देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा”, सुषमा अंधारेंची मागणी
दरम्यान, येत्या काही काळात राज्यात एव्हाना, देशात निवडणुकांचा धुराळा उडणार आहे. यातच राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर राजकीय गणित बदलल्यानंतर निकाल देखील वेगळा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे याची जोरदार तयारी सध्या दोन्ही बाजूने केली जात आहे.
आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात अंत्योदयाचे स्वप्न साकार होत आहे, जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. नव्या भारतात जातीवाद, परिवारवाद आणि तुष्टीकरणाच्या राजकारणाला थारा नाही. त्यामुळे आता आपली राजकीय पोळी भाजली जाणार नाही हे काँग्रेस नेत्यांना कळून चुकलं आहे.#BJP pic.twitter.com/McC9s77Ua9
— Ravindra Chavan (@DombivlikarRavi) April 8, 2023
Read also
हेही वाचा…आघाडीच्या पुण्यातील ‘वज्रमुठ’ सभेचं ठिकाण ठरलं, अजित पवारांकडे जबाबदारी, लाखांच्यावर गर्दी जमणार ?
हेही वाचा…कसब्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पुण्यात भाजपची तिरकी चाल, ‘या’ बड्या नावासाठी चाचपणी?
हेही वाचा…अदाणींबाबत केलेल्या शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले की,,,
हेही वाचा…“रावण राज्य चालवणारे अयोध्येला चालले”, आदित्य ठाकरेंच्या टिकेला मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर, म्हणाले की,,,,,
हेही वाचा…“ना पक्षात एकमत, ना महाविकास आघाडीमध्ये, 2024 ला आयेगा तो मोदीही”, भाजपने राष्ट्रवादीला डिवचलं