पुणे : खासदार गिरीश बापट यांच्या निधानानंतर सहा महिन्यानंतर पुणे लोकसभेची पोटनिवडणुक लागण्याची शक्यता आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अनेक इच्छुक उमेदवारांची नावं सध्या चर्चेत आहेत. तर महाविकास आघाडी देखील ही लोकसभेची पोटनिवडणुक लढण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. आता याच पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबत भाष्य केलं आहे.
हेही वाचा…तब्बल १७ तास नॉटरिचेबल..! बंडाच्या तयारीत ? अजित पवार अवतारले अन् सांगितली सगळी हकीकत
माझ्या माहितीप्रमाणे लोकसभा निवडणुकीला एक वर्ष आणि काही महिने राहिले आहेत. रेकॉर्ड पाहिलं तर कमी वेळ शिल्लक असतानाही निवडणुका झाल्या आहेत. पण या निवडणुकीच्या संदर्भात आयोगच निर्णय घेईल. निवडणुक आयोगाने निर्णय घेतला तर सर्व राजकीय पक्ष एकत्र येतील आणि तेही निर्णय घेतील. तर मागील निवडणुकीत महाविकास आघाडीने निर्णय घेतला होता. तसाच यावेळीही घेतला जाईल. निवडणुक आयोगाने अजून पोटनिवडणुकीची घोषणा केली नाही. त्यामुळे त्यावर चर्चा करणं योग्य नाही. रितसर घोषणा झाल्यावर सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन ठरवतील. बिनविरोध निवडणुक होणार अशी चर्चा झालीच नाही. असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंनी विचार केला तर त्यांना लहान भाऊ म्हणून मोदी माफ करतील”
दरम्यान, पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून स्वरदा बापट, माजी महापौर मुरलिधर मोहोळ, आणि माजी खासदार संजय काकडे यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून काॅंग्रेसच्या मोहन जोशी यांचं नाव समोर येत आहे. त्यामुळे या निवडणुकीत कुणाला उमेदवारी दिली जाते ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also
हेही वाचा…“थोडी नैतिकता दाखवून देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा”, सुषमा अंधारेंची मागणी
हेही वाचा…“पटोलेंनी विधानसभेचं अध्यक्षपद सोडलं, तेव्हापासून षडयंत्राला सुरूवात झाली”, आशिष देशमुखांचा गंभीर आरोप
हेही वाचा…“भाजपने एक कबुल केले की, अजितदादा राज्याच्या राजकारणातील सर्वात शक्तीशाली नेते”
हेही वाचा…“गौतम अदाणी प्रकरण..! जेपीसी चौकशीला शरद पवारांचा विरोध, सुचवला दुसरा पर्याय
हेही वाचा…“सध्या कलयुग सुरूअन् रावण राज्य चालवणारे अयोध्येला चालले”, आदित्य ठाकरेंची शिंदेंवर जहरी टिका