ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारबाबत आक्षेपार्ह रॅप सॉंग तयार करणाऱ्या दोन तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे. रॅप सॉंग मध्ये मोठ्या प्रमाणात शिव्यांचा वापर करण्यात आल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर जोरदार टिका करत तुम्ही २ आत घातले २० नवीन येतील हे लक्षात ठेवा असा इशारा दिला आहे.
हेही वाचा…““देवेंद्र फडणवीसांचं मन मोठं, उद्या समजा जर उद्धव ठाकरे..” भाजप अन् उद्धव ठाकरेंची पुन्हा युती होणार ?
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की, उमेश खाडे आणि राज मुंगसे यांना पोलिसांनी आत टाकून संविधान पायदळी तुडवले आहे. दोघे बहुजन समाजतले व्यवस्थेविरूद्ध बोलले आहे. त्यात त्यांची काय चुक आहे. म्हणे गाण्यात शिव्या आहेत. बहुजन समाजाला शिव्या काय नवीन नाहीत. आणि कोण म्हणते हे. पोलिस स्टेशनला तुकोबाचे अंभग म्हणतात का. तुझ्या आई ची .. इथून सुरूवात होते. पोलिस म्हणातात. गाण्यात शिव्या आहेत. पण नंतर हळूच म्हणतात परिस्थिती भयंकर आहे. काय करणार. २ आत घातले २० नवीन येतील हे लक्ष्यात ठेवा. असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व अन् विकासासाठी भाजपसोबत यावं,” भाजपच्या कॅबिनेट मंत्र्यांचं आवाहन, राजकीय वर्तुळात चर्चा
पुढे बोलतांना त्यांनी असं म्हटलं की, राम मुंगासे या नवोदित कलाकाराने एक गाणं म्हटलं म्हणून त्याच्या घरातून संभाजीनगर पोलीसांनी त्याला अटक केली व ते त्याला अंबरनाथ पोलीसांच्या हाती देतील. पण, त्याचा गुन्हा काय ? त्याने तर कोणाचे नाव देखिल घेतले नव्हते. 50 खोके हे कोणाचे नाव आहे का हे आधी पोलीसांनी स्पष्ट करावं. 50 खोके या वक्तव्याने जातीय तणाव किंवा धार्मिक तणाव निर्माण होतो कसा हे पोलीसांनी सिद्ध करावं. म्हणजे संविधान पायदळी तुडवण्याचाच निर्णय झाला आहे असे दिसतं. आम्ही सगळे राम मुंगासे याच्या पाठिशी आहोत. संपूर्ण महाराष्ट्र त्याच्या पाठिशी उभा राहील. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा गोठू शकत नाही. हे पोलीसी राज नाही.
हेही वाचा..“अमोल कोल्हेंना भाजपमध्ये यावे वाटले, तर आम्हाला त्यांना तिकीट द्यावेच लागेल”, चंद्रकांत पाटील
दरम्यान, “भोंगळी” हे रॅप गाणे तयार करणारा तरुण कलाकार उमेश खाडे आणि त्याच्या आई-वडीलांना वडाळा पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवले आहे. या गाण्यामध्ये आक्षेपार्ह असे काहीच नाही. त्याने कोणाचेही नाव घेतलेले नाही. आपल्या गरीबीवर तो या गाण्यामध्ये व्यथीत होऊन बोलला आहे. आता व्यथा व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल, तर मग कामावर जाणारे आणि ट्रेनमध्ये आपल्या व्यथा मांडणा-या प्रत्येकालाच अटक करा. असे किती जणांना तुम्ही अटक करणार आहात. तुम्ही लोकांच्या भावना अश्याप्रकारे दाबू शकत नाही. हे पोलीसी राज नाही. लोकशाहीमधील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्ही असे आपल्याला चिरडू देणार नाही. उमेश खाडेला लगेच सोडा. पोर-पोरींनो व्यक्त व्हा… फासा लटकवणार का … मी कायम तुमच्या बरोबर आहे .. आपला गळा दाबत आहे तुकाराम जेल मध्येच बसले असते ह्यानी तर नामदेव ढसाळ ह्यांना आयुश्य भर जेल मध्ये बसवले असते विद्रोह हा महाराष्ट्राच्या अणुरेणूत आहे. असंही आव्हाडांनी म्हटलं आहे.
उमेश खाडे आणि राज मुंगसे ह्यांना पोलिसांनी आत टाकून संविधान पायदळी तुडवले
दोघे बहुजन समाजातले
व्यवस्थे विरुद्ध बोलले
काय चूक केली म्हणे गाण्यात शिव्या आहेत … बहुजन समाजाला शिव्या काय नवीन आहेत ..
आणि कोण म्हणते हे … पोलिस
पोलिस स्टेशन ला तुकोबाचे अभंग म्हणतात का …
तुझ्या… pic.twitter.com/KnBk1lqTsB— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 7, 2023
Read also
हेही वाचा…“जर आपला देश धर्मानुसार चालला, तर या देशाचा देखील पाकिस्तान होईल”
हेही वाचा…“पुणे लोकसभा पोटनिवडणुकीकरीता मी देखील इच्छुक, पक्षाने जबाबदारी दिली तर,…” संजय काकडेंची प्रतिक्रिया
हेही वाचा.आंबेडकर जयंती अन् महात्मा जोतिबा फुलेंची जंयतीचं राष्ट्रवादीचं कार्यक्रम ठरलं, जयंत पाटलांचं कार्यकर्त्यांना सुचना
हेही वाचा…अयोध्या भगवामय,, गुवाहाटी झाली, आता अयोध्या, एकनाथ शिंदे आपल्या आमदारांसह आयोध्याला रवाना
हेही वाचा…संदीपान भुमरे म्हणतात, मला दानवेंचं मेंदू घ्यायला आवडेल, त्यावर अंबादास दानवेंनी दिलं उत्तर, म्हणाले,…