पुणे : महान समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनांच्या निमित्ताने या महापुरुषांच्या विचारांचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत. लोकशाही प्रबळ करण्यासाठी अधिकाधिक लोकांनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी केले आहे.
हेही वाचा…“नवनीत राणांनी पहिल्यांदा आपल्या बापाला शोधून काढावं, मग..” मनिषा कायंदेंच्या नवनीत राणांवर हल्लाबोल
१ एप्रिल २०२३ रोजी महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ‘शेतकऱ्यांचा आसूड’ या पुस्तकात नमूद असलेल्या अंधश्रद्धा, कर्मठ जातीयवाद, स्त्री वर्गाची स्थिती, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी महत्त्वाच्या विषयांची आजच्या परिस्थितीशी तुलनात्मक चर्चा करायची आहे. यादृष्टीने वक्ता, प्राध्यापक किंवा विचारवंत यांना आमंत्रित करून त्यांच्या व्याख्यानाद्वारे समाज प्रबोधनाचे कार्यक्रम घेण्यात यावेत, अशी सूचना प्रदेशाध्यक्षांनी केली आहे.
हेही वाचा…मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानातील पाहुणचार कोटींच्या घरात, विरोधकांची जोरदार टिका
१४ एप्रिल २०२३ रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा, तालुका, गाव पातळीवर त्यांचे स्मारक असलेल्या चौकांमध्ये सकाळी १०.१० वाजता सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन घटनेच्या रक्षणाकरता प्रतिज्ञा वाचन करावे. तसेच कार्यकर्त्यांनी मागासवर्गीय वस्त्यांमध्ये जाऊन बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या देशाच्या घटनेचे महत्त्व सर्वांना समजावून सांगावे. घटनेचा अपमान रोखण्यासाठी तसेच सर्व समाजांमध्ये बंधुभाव, प्रेम, सलोखा टिकून राहण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन धर्मांध शक्तींच्या विरोधात लढण्याचा निर्धार करावा, असे आवाहन प्रदेशाध्यक्षांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे.
Read also
हेही वाचा…अयोध्या भगवामय,, गुवाहाटी झाली, आता अयोध्या, एकनाथ शिंदे आपल्या आमदारांसह आयोध्याला रवाना
हेही वाचा…संदीपान भुमरे म्हणतात, मला दानवेंचं मेंदू घ्यायला आवडेल, त्यावर अंबादास दानवेंनी दिलं उत्तर, म्हणाले,…
हेही वाचा…““देवेंद्र फडणवीसांचं मन मोठं, उद्या समजा जर उद्धव ठाकरे..” भाजप अन् उद्धव ठाकरेंची पुन्हा युती होणार ?
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व अन् विकासासाठी भाजपसोबत यावं,” भाजपच्या कॅबिनेट मंत्र्यांचं आवाहन, राजकीय वर्तुळात चर्चा
हेही वाचा..“अमोल कोल्हेंना भाजपमध्ये यावे वाटले, तर आम्हाला त्यांना तिकीट द्यावेच लागेल”, चंद्रकांत पाटील