मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या सरकारी निवासस्थानी येणाऱ्या महत्वाच्या पाहुण्यांच्या खानपान सेवांसाठी पुरवठादार निश्चित करण्यात आले. यात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थातील खानपानासाठी अंदाजित खर्च अनुक्रमे ३.५० कोटी इतका असेल तर उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यातील खानपानासाठी १.५० कोटींचा खर्चाला मंजूरी देण्यात आली आहे. यावर आता राष्ट्रवादीने राज्य सरकारवर जहरी टिका केली.
हेही वाचा…“डंके की चोट पे…!” गुणरत्ने सदावर्तेंना मोठा दणका..! उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका
मुख्यमंत्र्यांच्या वर्षाने खानपानाच्या खर्चाची कोटीच्या कोटी उड्डाणे केल्यानंतर विरोधकांनी याबाबत तीव्र टिका केली होती. त्यावेळी पाहुणचारावर होणाऱ्या वारेमाप खर्चाचे मुख्यमंत्र्यांनी समर्थन केले होते. जनता महागाईने होरपळत असताना मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट देणाऱ्या त्यांच्या समर्थकांच्या खानपानावर होणारा कोटींचा खर्च राज्यासाठी हिताचा नाही ही भूमिका विरोधकांनी मांडली होती.
हेही वाचा…“उद्धव ठाकरे तुम्हाला फडतूस म्हणतायत, तुम्ही जर खरचं काडतूस आहात, तर मग एखादी गोळी चालवून दाखवा”, मनसेनचं आवाहन
पण आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर होणाऱ्या पाहुणाचारावरील खर्चाला कात्री लावण्याचा निर्णय सरकारनेचे घेतला आहे. यावरून विरोधकांचे मुद्दे योग्य होते हे सिद्ध झाले आहे. आतातरी जनहिताच्या योजनांवरील खर्चाकडे मुख्यमंत्र्यांनी अधिक लक्ष द्यावे ही अपेक्षा असं राष्ट्रवादीने म्हटलं आहे.
Read also
हेही वाचा…“राजकीय नेत्यांना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात,” प्रेमात धोका मिळाल्याने नेत्यांकडून खंडणी मागत होता
हेही वाचा…““राजकीय नेत्यांना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात,” प्रेमात धोका मिळाल्याने नेत्यांकडून खंडणी मागत होता
हेही वाचा..शिरुर लोकसभेत भाजपा सुसाट, महाविकास आघाडी ‘कोमात’
हेही वाचा…“घोटाळेबाज, भ्रष्टाचारी लोकांची चौकशी तर दुरच त्यांच्याशी मैत्री करून संरक्षण दिले जाते”, काॅंग्रेसची भाजपवर जहरी टिका
हेही वाचा…“वरळीतील जनता सेटिंग लावून निवडून गेलेल्या आमदारावर नाराज”, मनसेनं आदित्य ठाकरेंना डिवचलं