ठाणे : राज्यात झालेल्या सत्तासंघर्षाचा परिणाम आगामी निवडणुकांमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. त्यानुसार सध्या राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष निवडणुकांची जोरदार तयारी करतांना दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर मुंबई महानगरपालिका आणि वरळीतील विधानसभेच्या जागेवर भाजप आणि शिंदे गटाचं विशेष लक्ष आहे. यावरून आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेचे युवा नेते आणि वरळी मतदार संघातील आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“पवार साहेबांनी जेव्हा कृषी विभागाची सूत्रं हाती घेतली, तेव्हा देशाला निर्यातीची दारं खुली केली”
संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. वरळीतील जनता सेटिंग लावून निवडून गेलेल्या आमदारावर नाराज असल्याचं संदीप देशपांडे यांनी म्हटलं. तसेच आपण पुन्हा वरळीतून निवडून येणार नाही, याची जाणीव झाल्यामुळे ठाण्याला पळून जाण्याचा प्रयत्न तर चालू नाहीना ? असा खोचक सवालही संदीप देशपांडे यांनी केला आहे.
हेही वाचा…“कृपया मी जी चिंता करतो, ती गांभीर्याने घ्या,” शरद पवारांचं थेट केंद्र सरकारला “त्याबाबत” पत्र
दरम्यान, आदित्य ठाकरे वारंवार शिंदे गटाला निवडणुकीचं आवाहन देत आहे. त्यावर शिवसेना शिंदे गटातील आमदार देखील आदित्य ठाकरे यांना आवाहन देत आहेत. त्यामुळे आता आगामी महानगरपालिका आणि विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
वरळीतील जनता सेटिंग लावून निवडून गेलेल्या आमदारावर नाराज आहे.आपण पुन्हा वरळीतून निवडून येणार नाही याची जाणीव झाल्यामुळे ठाण्याला पळून जाण्याचा प्रयत्न तर चालू नाहीना ???
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 7, 2023
Read also
हेही वाचा…“डंके की चोट पे…!” गुणरत्ने सदावर्तेंना मोठा दणका..! उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका
हेही वाचा…“उद्धव ठाकरे तुम्हाला फडतूस म्हणतायत, तुम्ही जर खरचं काडतूस आहात, तर मग एखादी गोळी चालवून दाखवा”, मनसेनचं आवाहन
हेही वाचा..रोशनी शिंदे प्रकरण..! महिला आयोगाने थेट पोलिसांना पाठविली नोटीस, चौकशीसाठी हजर राहण्याचे दिले आदेश
हेही वाचा…अजित पवारांकडून विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू, गेल्या तीन महिन्यांपासून…
हेही वाचा…“रॅप साॅंगमध्ये ५० खोक्यांचा उल्लेख, एका तरूणाला अटक, ब्रिटीश राजवटीची आठवण करून देणारा धोकादायक कारभार”