पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं सरकार आल्यानंतर देशात धार्मिकतेवरून राजकारण करण्याचा प्रमाण जास्त वाढलेलं दिसून आहे. भाजपने देखील या काळात अनेक धार्मिक मुद्दे उपस्थित करत लोकांना आकर्षित केलं आहे. यावरून विरोधक सत्ताधारी पक्षांवर जोरदार टिका करतांना दिसत आहे. यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदींवर टिका करत मोठी शक्यता व्यक्त केली आहे.
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व अन् विकासासाठी भाजपसोबत यावं,” भाजपच्या कॅबिनेट मंत्र्यांचं आवाहन, राजकीय वर्तुळात चर्चा
हा देश भारताच्या घटनेनुसारच चालला पाहिजे. जर देश धर्मानुसार चालला, तर या देशाचा देखील पाकिस्तान होईल. या देशाचा इराण होईल. या देशाचा इराक होईल. या देशाचा सिरिया आणि म्यानमार होईल. बाळासाहेब ठाकरे हिंदूहह्यसम्राट म्हणून ओळखले जातात. भाजपाचं हिंदूत्व नंतर आलं. त्यांचं हिंदुत्व चोरलेलं आहे. ते बोगस आहे. अशी टिकाही त्यांनी भाजप आणि शिंदेंवर केली.
हेही वाचा..“अमोल कोल्हेंना भाजपमध्ये यावे वाटले, तर आम्हाला त्यांना तिकीट द्यावेच लागेल”, चंद्रकांत पाटील
पुढे बोलतांना ते म्हणाले की, देशाची लोकशाही टिकवायची असेल तर कोणत्याही परिस्थितीत ईव्हिएमला विरोध झाला पाहिजे आणि निवडणुका मतपत्रिकेवर झाल्या पाहिजे. या देशातील निवडणुक प्रक्रियेवर लोकांना संशय आहे. आपला शेजारी देश बांग्लादेश आहे. इव्हिएमवर निवडणुका होणारा बांग्लादेश भारतानंतर शेवटचा देश होता. त्या बांगलादेशच्या प्रमुख शेख हसिना यांनी इव्हीएम निवडणुका रद्द करून मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची घोषणा केली असल्याचंही संजय राऊतांनी म्हटलं.
Read also
हेही वाचा…“पुणे लोकसभा पोटनिवडणुकीकरीता मी देखील इच्छुक, पक्षाने जबाबदारी दिली तर,…” संजय काकडेंची प्रतिक्रिया
हेही वाचा.आंबेडकर जयंती अन् महात्मा जोतिबा फुलेंची जंयतीचं राष्ट्रवादीचं कार्यक्रम ठरलं, जयंत पाटलांचं कार्यकर्त्यांना सुचना
हेही वाचा…अयोध्या भगवामय,, गुवाहाटी झाली, आता अयोध्या, एकनाथ शिंदे आपल्या आमदारांसह आयोध्याला रवाना
हेही वाचा…संदीपान भुमरे म्हणतात, मला दानवेंचं मेंदू घ्यायला आवडेल, त्यावर अंबादास दानवेंनी दिलं उत्तर, म्हणाले,…
हेही वाचा…““देवेंद्र फडणवीसांचं मन मोठं, उद्या समजा जर उद्धव ठाकरे..” भाजप अन् उद्धव ठाकरेंची पुन्हा युती होणार ?