मुंबई : हिंडेनबर्ग अहवालानंतर देशात गौतम अदाणींची जेसीपी मार्फत चौकशी व्हावी, अशी विरोधकांनी मागणी लावून धरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदाणी यांच्याविरोधात देशभरात काॅंग्रेसने आंदोलने देखील केले. तर संसदेत खासदार राहुल गांधी यांनी देखील हा मुद्दा लावून धरला. याच पार्श्वभूमीवर आता गौतम अदाणींची जेपीसी मार्फत नाही तर सर्वोच्च न्यायालया मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.
हेही वाचा…“जर आपला देश धर्मानुसार चालला, तर या देशाचा देखील पाकिस्तान होईल”
शरद पवार यांनी म्हटलं की या प्रकरणाचा तपासात स्वत: सर्वोच्च न्यायालयाने पुढाकार घेतला पाहिजे. त्यांनी समिती नियुक्त केली. तर समितीत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश, जाणकार, तज्ज्ञ अशा लोकांचा समावेश आहे. त्यांना मार्गदर्शक सुचना आणि वेळ देण्यात आला. तसेच याचा तपास करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं. दुसरीकडे विरोधी पक्षांची मागणी होती की, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समितीची नियुक्त करा. जर संसदेची नियुक्त केली तर आज संसदेत बहुमत सत्ताधारी पक्षाचं आहे. ही मागणी सत्ताधारी पक्षाच्या विरोधातीलच आहे. अशा वेळी सत्ताधारी भाजपाशी संबंधित विषयाची चौकशी करणाऱ्या समितीत भाजपाचं बहुमत राहिलं असतं. त्यामुळे सत्य बाहेर येणार की नाही, याविषयी संशय निर्माण होऊ शकतो. असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“पुणे लोकसभा पोटनिवडणुकीकरीता मी देखील इच्छुक, पक्षाने जबाबदारी दिली तर,…” संजय काकडेंची प्रतिक्रिया
सर्वोच्च न्यायालयाच्या समितीचा विचार केला, तर तिथं सत्ताधारी किंवा विरोधकांशी संबंधित कुणी नाही. त्यांनी चौकशी केली तर अधिक सत्य देशासमोर येईल. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात तपास करण्याची घोषणा केल्यानंतर संसदेच्या समितीकडून याची चौकशी करण्याला महत्व राहिलं नाही, त्याची आवश्यकता राहिली नाही. असंही शरद पवार यांनी म्हटलं.
Read also
हेही वाचा…“सध्या कलयुग सुरूअन् रावण राज्य चालवणारे अयोध्येला चालले”, आदित्य ठाकरेंची शिंदेंवर जहरी टिका
हेही वाचा…तब्बल १७ तास नॉटरिचेबल..! बंडाच्या तयारीत ? अजित पवार अवतारले अन् सांगितली सगळी हकीकत
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंनी विचार केला तर त्यांना लहान भाऊ म्हणून मोदी माफ करतील”
हेही वाचा…राहुल गांधी, पटोले, खरगेंवरील टिका भोवली, काॅंग्रेसचा मोठा नेता निलंबित, आता राष्ट्रवादीत करणार प्रवेश ?
हेही वाचा…“तुम्ही २ आत टाकले अजून २० तयार होतील, लक्ष्यात ठेवा,” जितेंद्र आव्हाडांनी दिला राज्य सरकारला कडक इशारा