मुंबई : उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी आणि विकासासाठी आमच्यासोबत यावं. शरद पवार यांनी ज्या पद्धतीने इतर पक्षांची माफी केली. तसं तुमची देखील करतील. असं विधान पुण्याचे पालकमंत्री आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दिपक केसरकर यांनी देखील उद्धव ठाकरे यांनी आता प्रयत्न करावेत. असं म्हटलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत जाणार का ? अशी चर्चा सध्या राजकारणात सुरू झाली आहे.
हेही वाचा…अयोध्या भगवामय,, गुवाहाटी झाली, आता अयोध्या, एकनाथ शिंदे आपल्या आमदारांसह आयोध्याला रवाना
चंद्रकांत पाटील म्हणाले की, ज्यांना हिंदुह्यदय बाळासाहेब ठाकरे यांनी जवळसुद्धा घेतलं नाही. ती काही काही लोकं भांडण लावून आपला स्वार्थ साधताहेत. त्यांच्या मांडीला मांडी लावून आपला अजेंंठा बदलत आहेत. उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत यावं, ही आमची आता राजकीय आवश्यकता नाही. आम्ही त्यासाठी आता सक्षम आहोत. ही हिंदुत्वाची आणि विकासाची आवश्यकता आहे. पवार साहेबांनी अनेक पक्षांची माफी केली. तसं तुमची देखील करतील. असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
हेही वाचा…संदीपान भुमरे म्हणतात, मला दानवेंचं मेंदू घ्यायला आवडेल, त्यावर अंबादास दानवेंनी दिलं उत्तर, म्हणाले,…
आम्हाला जे काही प्रयत्न करायचे होते ते आम्ही केले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवायचे हे उद्धव ठाकरेंनीच ठरवले होते. पण शरद पवारांनी माझ्यावर दबाव आणला आणि मला मुख्यमंत्री व्हायला लागले असं ठाकरेंचे म्हणणं होते. नाहीतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच असले असते. त्यामुळे सध्या उद्धव ठाकरेंच्या मनातीलच मुख्यमंत्री राज्यात आहेत. त्यामुळे त्यांना फारसं वाईट वाटू नये. असं दिपक केसरकर यांनी म्हटलं आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी जर विचार केला तर नरेंद्र मोदी त्यांना छोटा भाऊ म्हणून माफ करतील. असंही दिपक केसकर यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…““देवेंद्र फडणवीसांचं मन मोठं, उद्या समजा जर उद्धव ठाकरे..” भाजप अन् उद्धव ठाकरेंची पुन्हा युती होणार ?
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांचं मन किती मोठं आहे. हे मला माहिती आहे. गेली चाळीस वर्ष आम्ही बरोबर काम करीत आहोत. परंतु ते काहीही सहन करून घेणारे नाहीत. यातच कुणी आम्हाला बोललं तर आम्ही त्यांना सोडत नाहीत. उद्या समजा उद्धव ठाकरे म्हणाले की, रात गई बात गई तसेच उद्या हिंदूत्वाच्या मुद्यासाठी तर त्याची काही हरकत नाही. परंतु त्यांनी जसं केलं तसं आम्ही करणार नाही. तसेच एखादी गोष्ट जुळायची असेल तर त्याचं तारतम्य बाळगलं पाहिजे. असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.
Read also
हेही वाचा…राहुल गांधी, पटोले, खरगेंवरील टिका भोवली, काॅंग्रेसचा मोठा नेता निलंबित, आता राष्ट्रवादीत करणार प्रवेश ?
हेही वाचा…“तुम्ही २ आत टाकले अजून २० तयार होतील, लक्ष्यात ठेवा,” जितेंद्र आव्हाडांनी दिला राज्य सरकारला कडक इशारा
हेही वाचा…“जर आपला देश धर्मानुसार चालला, तर या देशाचा देखील पाकिस्तान होईल”
हेही वाचा…“पुणे लोकसभा पोटनिवडणुकीकरीता मी देखील इच्छुक, पक्षाने जबाबदारी दिली तर,…” संजय काकडेंची प्रतिक्रिया
हेही वाचा.आंबेडकर जयंती अन् महात्मा जोतिबा फुलेंची जंयतीचं राष्ट्रवादीचं कार्यक्रम ठरलं, जयंत पाटलांचं कार्यकर्त्यांना सुचना