मुंबई : हिंडेनबर्ग अहवालानंतर देशात गौतम अदाणींची जेसीपी मार्फत चौकशी व्हावी, अशी विरोधकांनी मागणी लावून धरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदाणी यांच्याविरोधात देशभरात काॅंग्रेसने आंदोलने देखील केले. तर संसदेत खासदार राहुल गांधी यांनी देखील हा मुद्दा लावून धरला. याच पार्श्वभूमीवर आता गौतम अदाणींची जेपीसी मार्फत नाही तर सर्वोच्च न्यायालया मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. त्यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
हेही वाचा…“पटोलेंनी विधानसभेचं अध्यक्षपद सोडलं, तेव्हापासून षडयंत्राला सुरूवात झाली”, आशिष देशमुखांचा गंभीर आरोप
अजित पवारांना शरद पवारांच्या विधानाबाबत विचारले असता. ते म्हणाले की, मीही काल शरद पवारांची मुलाखत बघितली. शरद पवार हे आमचे सर्वोच्च नेते आहेत. आमच्या पक्षाच्या नेत्याने भूमिका मांडल्यानंतर आम्ही त्याबद्दल बोलू शकत नाही. ज्यांची जी भूमिका आहे, तीच आमच्या पक्षाची भूमिका आहे. असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“भाजपने एक कबुल केले की, अजितदादा राज्याच्या राजकारणातील सर्वात शक्तीशाली नेते”
शरद पवार यांनी म्हटलं की या प्रकरणाचा तपासात स्वत: सर्वोच्च न्यायालयाने पुढाकार घेतला पाहिजे. त्यांनी समिती नियुक्त केली. तर समितीत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश, जाणकार, तज्ज्ञ अशा लोकांचा समावेश आहे. त्यांना मार्गदर्शक सुचना आणि वेळ देण्यात आला. तसेच याचा तपास करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं. दुसरीकडे विरोधी पक्षांची मागणी होती की, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समितीची नियुक्त करा. जर संसदेची नियुक्त केली तर आज संसदेत बहुमत सत्ताधारी पक्षाचं आहे. ही मागणी सत्ताधारी पक्षाच्या विरोधातीलच आहे. अशा वेळी सत्ताधारी भाजपाशी संबंधित विषयाची चौकशी करणाऱ्या समितीत भाजपाचं बहुमत राहिलं असतं. त्यामुळे सत्य बाहेर येणार की नाही, याविषयी संशय निर्माण होऊ शकतो. असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“गौतम अदाणी प्रकरण..! जेपीसी चौकशीला शरद पवारांचा विरोध, सुचवला दुसरा पर्याय
सर्वोच्च न्यायालयाच्या समितीचा विचार केला, तर तिथं सत्ताधारी किंवा विरोधकांशी संबंधित कुणी नाही. त्यांनी चौकशी केली तर अधिक सत्य देशासमोर येईल. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात तपास करण्याची घोषणा केल्यानंतर संसदेच्या समितीकडून याची चौकशी करण्याला महत्व राहिलं नाही, त्याची आवश्यकता राहिली नाही. असंही शरद पवार यांनी म्हटलं.
Read also
हेही वाचा…“अयोध्या दौऱ्यात खासदार श्रीकांत शिंदेंचीच हवा, ठिकठिकाणी लागले बॅनर्स
हेही वाचा…“रावण राज्य चालवणारे अयोध्येला चालले”, आदित्य ठाकरेंच्या टिकेला मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर, म्हणाले की,,,,,
हेही वाचा…“ना पक्षात एकमत, ना महाविकास आघाडीमध्ये, 2024 ला आयेगा तो मोदीही”, भाजपने राष्ट्रवादीला डिवचलं
हेही वाचा…पुणे लोकसभा पोटनिवडणुक बिनविरोध होणार की थेट लढत ? अजित पवारांनी स्पष्टचं सांगितलं
हेही वाचा…“थोडी नैतिकता दाखवून देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा”, सुषमा अंधारेंची मागणी