नागपुर : आशिष देशमुख यांनी अलिकडेच काॅंग्रसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या निवडीवर आशिष देशमुख यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर त्यांनी खासदार राहुल गांधी आणि त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टिका केली होती. त्यानंतर नाना पटोले यांनी आशिष देशमुख यांच्यावर कारवाई होणार असल्याचं संकेत दिले होते. त्यानंतर आज काॅंग्रेसकडून अधिकृतपणे आशिष देशमुख यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांना आता कारणे पाठवा नोटीस पाठविली आहे. त्यावर आता आशिष देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…अदाणींबाबत केलेल्या शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले की,,,
काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शिस्त पालन समितीने मला नोटीस पाठवली असून निश्चितपणे वेळेआधी मी त्या नोटीसीला उत्तर देणार आहे. खोके, सुरत, गुवाहाटी आणि छत्रपती संभाजीनगर येथील सभेत प्रदेशाध्यक्षांची गैरहजरी, तसेच १६ तारखेला नागपुर येथील वज्रमुठ सभेबाबत यासंदर्भात मला विचारण्यात आलं आहे. तसेच नाना पटोले यांनी न विचारता विधासभा अध्यक्षपदाची राजीनामा दिला. त्यांच्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडले. म्हणून नाना पटोलें यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यायला पाहिजे होती. असंही आशिष देशमुख यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“रावण राज्य चालवणारे अयोध्येला चालले”, आदित्य ठाकरेंच्या टिकेला मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर, म्हणाले की,,,,,
माझ्यावर सध्या षडयंत्र रचलं जात आहे. ज्यावेळी विधानसभेचे अध्यक्ष असतांना नाना पटोले यांनी तडकाफडकी राजीनामा देतात. तेव्हाच संशयाची सुई माझी त्यांच्यावर गेली होती. त्यामुळे मला काॅंग्रेसमधून बाहेर काढण्याचं षडयंत्र तेव्हापासून सुरू झालं आहे. त्याचं उत्तर माझ्या उत्तरात स्पष्टिकरण देणार. माझं म्हणणं शिस्तपालन समितीला पटेल अन् मला खात्री आहे की, हे माझं म्हणणं काॅंग्रेस पक्षासाठी हिताचं आहे. ते माझ्यावर अशी कारवाई करणार नाहीत. अशी शक्यताही आशिष देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
Read also
हेही वाचा…“राष्ट्रवादीने अगोदर भुजबळ, मग नारायण राणेंना अन् त्यानंतर राज ठाकरेंना शिवसेनेतून फोडलं”
हेही वाचा…“नारायण राणेंना अटक होऊ शकते तर उद्धव ठाकरेंना का अटक होऊ शकत नाही” ?
हेही वाचा…” ते आता काॅंग्रेस नेत्यांना कळून चुकलंय,” भाजप आमदाराने निवडणुकीच्या आधी मीठ चोळलं
हेही वाचा…आघाडीच्या पुण्यातील ‘वज्रमुठ’ सभेचं ठिकाण ठरलं, अजित पवारांकडे जबाबदारी, लाखांच्यावर गर्दी जमणार ?
हेही वाचा…कसब्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पुण्यात भाजपची तिरकी चाल, ‘या’ बड्या नावासाठी चाचपणी?