राज्यातील महापालिका निवडणुका कधी होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. निवडणुका होत नसल्याने राज्यातील अनेक महापालिकांमध्ये प्रशासकही नेमण्यात आले आहेत. काही महापालिकांमध्ये तर दोन वर्षांपासून प्रशासक आहेत. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सध्या प्रशासक भरोसे चालला आहे.
हेही वाचा…“नारायण राणेंना अटक होऊ शकते तर उद्धव ठाकरेंना का अटक होऊ शकत नाही” ?
राजकारण्यांकडूनही या निवडणुकांबाबतची कोणतीच माहिती दिली जात नाहीये. मात्र, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पहिल्यांदाच या निवडणुकीवर भाष्य केलं आहे. एवढेच नव्हे तर या निवडणुका कोणत्या महिन्यात होऊ शकतात याची शक्यताही वर्तवली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यंदाच होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
चंद्रकांत पाटील हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील? असा सवाल करण्यात आला. त्यावर आज त्याबाबत सुनावणी आहे. पण मला अजूनही वाटतं की या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होतील, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यंदाच्याच वर्षी म्हणजे ऑक्टोबरमध्ये होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
हेही वाचा…” ते आता काॅंग्रेस नेत्यांना कळून चुकलंय,” भाजप आमदाराने निवडणुकीच्या आधी मीठ चोळलं
खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर निवडणुका होणार आहेत. त्यासाठी भाजपमध्ये तीन नावांची चर्चा आहे. त्याबाबत पाटील यांना छेडण्यात आलं असता पाटील यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली.
Read also
हेही वाचा…“अजित पवार यांची गणना भाजपच्या अंधभक्तात होऊ नये ही आशा”
हेही वाचा…“संजय राऊतांनी गंगेत स्नान करून आपली पापं धुतली पाहिजे”
हेही वाचा…“नाना पटोलेंमुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले”, काॅंग्रेस नेत्याचाच पटोलेंवर गंभीर आरोप
हेही वाचा…“राष्ट्रवादीने अगोदर भुजबळ, मग नारायण राणेंना अन् त्यानंतर राज ठाकरेंना शिवसेनेतून फोडलं”