ईव्हीएम मशीन वापराच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यात शीत युद्ध चालू आहे. बांगलादेशाने ईव्हीएम मशीन बंद केली आहे. विरोधी पक्षांनी मागणी करताच बांगलादेश सरकारने हा निर्णय घेतला आहे. याला लोकशाही म्हणतात, असं संजय राऊत यांनी म्हटलं होत.
हेही वाचा…कसब्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पुण्यात भाजपची तिरकी चाल, ‘या’ बड्या नावासाठी चाचपणी?
तर ईव्हीएम मशीनचा गैरवापर होतो तर दिल्ली, पंजाब, आंध्रप्रदेश, तेलंगना आणि बांगलादेशात विरोधी पक्षाची सरकारे कशी आली? असा सवाल अजित पवार यांनी राऊत यांना केला आहे. अजित पवारांच्या या प्रश्नाला आता संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. अजितदादांची भाजपच्या अंधभक्तात गणना होऊ नये, असा चिमटा राऊत यांनी काढला आहे.
हेही वाचा…” ते आता काॅंग्रेस नेत्यांना कळून चुकलंय,” भाजप आमदाराने निवडणुकीच्या आधी मीठ चोळलं
शरद पवारांच्या घरी दिल्लीत बैठक झाली होती. ईव्हीएमच्या घोटाळ्यावर ही बैठक झाली होती. ईव्हीएमवर सर्वच विरोधी पक्षाने आक्षेप घेतला आहे. निवडणूक आयोगाला काही प्रश्नही विचारले आहेत. अजित पवार यांना ईव्हीएमवर विश्वास असेल तर असू द्या. पण देशातील जनतेला नाही. जे भाजपचे भक्त आणि अंधभक्त आहेत त्यांचा ईव्हीएमवर विश्वास आहे. अजित पवार यांची गणना अंधभक्तात होऊ नये असं वाटतं, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
Read also
हेही वाचा…“संजय राऊतांनी गंगेत स्नान करून आपली पापं धुतली पाहिजे”
हेही वाचा…“नाना पटोलेंमुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले”, काॅंग्रेस नेत्याचाच पटोलेंवर गंभीर आरोप
हेही वाचा…“राष्ट्रवादीने अगोदर भुजबळ, मग नारायण राणेंना अन् त्यानंतर राज ठाकरेंना शिवसेनेतून फोडलं”
हेही वाचा…“नारायण राणेंना अटक होऊ शकते तर उद्धव ठाकरेंना का अटक होऊ शकत नाही” ?