बाबरी मशीदीबाबत उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
एका टीव्ही मुलाखतीत चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे. या मुलाखतीत चंद्रकांत पाटील यांनी असेही म्हटले आहे की, त्यावेळी ते स्वतः व्यवस्थापनाशी संबंधित कामाच्या संदर्भात अयोध्येत उपस्थित होते. चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वक्तव्याद्वारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरच प्रश्न उपस्थित केला आहे का असंही विचारलं जात आहे.
हेही वाचा… Big News: महाराष्ट्र काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप, दोन आमदार करणार पक्षांतर !
महाराष्ट्राचे मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी (10 एप्रिल) असा दावा केला की, “6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतील बाबरी मशीद बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनीने पाडली तेव्हा शिवसेनेचा एकही कार्यकर्ता घटनास्थळी उपस्थित नव्हता.” पाटील यांनी एका प्रादेशिक वृत्तवाहिनीमध्ये बोलताना सांगितलं की, “मला अयोध्येतील कारसेवकांच्या सोयीसाठी बजरंग दलाने तीन-चार महिने तिथे ठेवले होते. यात सहभाग घेतलेले लोक बजरंग दल, विहिंप (विश्व हिंदू परिषद) किंवा दुर्गा वाहिनीचे होते.”
हेही वाचा… मुख्यमंत्री शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यानंतर राजकीय घडामोडींना वेग, अमित शाह लवकरच…
चंद्रकांत पाटील म्हणाले की “आरएसएसची ताकद आमच्या पाठीशी होती पण ती उघडपणे सहभागी झाली नाही. त्यांनी त्यांची काम समविचारी संघटनांना वाटून दिली होती.” ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत बाबरी मशीद पाडल्याबद्दल नेहमीच बोलत असतात, पण मनात खरचं प्रश्न पडतो की ते त्यावेळी अयोध्येतही होते का?” असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
Read also
हेही वाचा… 19 बंगले घोटाळा आरोपांच्या प्रकरणी मोठी कारवाई; रश्मी ठाकरे यांच्या अडचणी वाढणार?
हेही वाचा…“स्वत:च काही दिवसांत बंडखोरी..”; शिंदे गटाच्या महिला खासदाराचे राजकीय भुकंप करणारे विधान