राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर पुन्हा एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्यक्त केली आहे. दमानिया यांनी एक पोस्ट शेअर केली असून त्यात सध्या विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार हे पुन्हा भाजपसोबत जाणार असल्याची माहिती मिळाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं अंजली दमानिया यांच्या या स्फोटक पोस्ट वरून पुन्हा एकदा पाहतच शपथविधी होणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केलं आणि 40 आमदारांसोबत वेगळा निर्णय घेतला. शिंदे आणि 40 आमदारांच्या बंडामुळे शिवसेनेचे दोन गट पडले. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जात मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, पण यादरम्यान सुप्रीम कोर्टात त्यांच्या अपात्रतेचा मुद्दा गेला. सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा प्रलंबित आहे. घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली असून सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या घटनापीठाने निकाल राखून ठेवला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या चर्चा होत असतानाच अंजली दमानिया यांच्या एका ट्विटने खळबळ उडवली आहे. दमानिया म्हणतात, “आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत, आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत…. तेही लवकरच. बघू….. आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची”, असं ट्विट दमानिया यांनी केलं आहे.
हेही वाचा… “बाबरी कुणी पाडली? एकही शिवसैनिकाचा हात नव्हता”; चंद्रकांत पाटलांचं खळबळजनक वक्तव्य
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकाल मे मध्ये येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा निकाल कुणाच्या बाजूने जाणार याकडे महाराष्ट्राच्याच नव्हे तर दिल्लीतील सत्ता केंद्राचंही लक्ष लागलेलं आहे.
आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत, आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत…. तेही लवकरच
बघू…..
आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) April 11, 2023
Read also
हेही वाचा… “याचा परिणाम…”; राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
हेही वाचा… सर्वात मोठी बातमी, हसन मुश्रीफ यांना मुंबई सत्र न्यायालयाचा सर्वात मोठा झटका..!
हेही वाचा… शरद पवारांचा उद्धव ठाकरेंवर रोष?; “आम्हाला विचारत घेतलं नाही”, म्हणत व्यक्त केली खंत
हेही वाचा… “माझ्या वक्तव्याचा ध चा म केला गेला”; चंद्रकांत पाटलांचा रोख नक्की कुणावर?