महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला असून, या निकालापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं भाकित केलं. फडणवीस यांनी सुप्रीम कोर्टातील सुनावणी दरम्यान झालेल्या युक्तिवादाचा हवाला देत उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री कसे होऊ शकत नाही, यावर स्पष्ट भूमिका मांडली.
हेही वाचा… चंद्रकांतदादांचे काम म्हणजे “गिरे तो भी टांग उपर”, दादा आता तरी जरा दमान घ्या!
“सुप्रीम कोर्टाच्या निकालाबद्दल अंदाज लावणे चुकीचं आहे. आमच्या भूमिकेमुळे आम्हाला असं वाटतं की, तो योग्य पद्धतीने येईल. मी आज माझं भाकित सांगतो की, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. त्यांच्याच मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात निवडणुकीला सामोरं जाऊ. हे सरकार स्थिर आहे. या सरकारमध्ये कुठलाही बदल होणार नाही. आणि शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील.”
हेही वाचा… का हवीय राष्ट्रवादीला पुणे लोकसभेची जागा? काँग्रेसशी दोन हात करण्याची तयारी..
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “2019 नंतरच्या अंदाज व्यक्त करणं माध्यमांनी सोडून दिलं आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल लागण्यापूर्वी सध्या प्लान ए,बी, सी ची चर्चा होताहेत. त्यावर फडणवीस म्हणाले, “ज्यांनी सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी बघितली, त्यांच्या हे लक्षात आलं असेल, की उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेलेले नाहीत. त्यामुळे त्यांचं सरकार परत येऊ शकत नाही. मी वकील आहे. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर सुप्रीम कोर्ट त्यांनी दिलेल्या राजीनामा रद्द करून त्यांना परत कसं आणून बसवणार नाही. कोर्टातील काम बघितलं, तर त्यांची मागणी तिचं होती.”
Read also
हेही वाचा… भाजप नेत्या पंकजा मुंडे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर मोठी रेड
हेही वाचा… राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते हसन मुश्रीफ यांना उच्च न्यायालयातून दिलासा..!
हेही वाचा… ‘एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड का केले?’; आदित्य ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
हेही वाचा… अजित पवार भाजपसोबत जाणार? शरद पवारांच्या नव्या भूमिकेमुळे राजकारणात खळबळ